शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

वर्ध्यात बापूंनी नाकारलेल्या अतिरेकी विकासालाच मिळतेय चालना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:53 AM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे.

ठळक मुद्देगांधीवादी, पर्यावरणपे्रमींमध्ये रोष सेवाग्राम आराखड्यातील कामात शेकडो वृक्षांचा बळी

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अतिरेकी विकासाला नाकारून वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र, त्यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे. त्यामुळे बापूंना नको असलेला निसर्ग ‘भकास’ करणारा ‘विकास’ चक्क गांधीभूमीतच होत असल्याने गांधीविचारक व पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांना गती दिली जात आहे. या आराखड्यांतर्गत दत्तपूर-वर्धा-सेवाग्राम या मार्गाचे चौपदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाकरिता आतापर्यंत ७० वृक्ष तोडण्यात आले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. वर्धा ते सेवाग्राम या मार्गालगत लावलेले बहुतांश वृक्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या काळातील आहेत. जवळपास ७५ ते ८० वर्षांपासून वर्धेकरांना शुद्ध हवा आणि सावली देणाऱ्या या वृक्षांचे आता विकासाच्या झंझावातात सरपण होत आहे. वृक्षांची होणारी ही कत्तल गांधीविचार, पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांना असहनीय असल्याने त्यांनी याला विरोध दर्शवून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वृक्षांच्या संवर्धनासाठी गांधीभूमीतील आंदोलनाची धग आता समाजमाध्यमांद्वारे देशपातळीवरही पोहोचली आहे.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत दत्तपूर ते सेवाग्राम या जवळपास १२ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गांतर्गत ३ हजार वृक्ष येतात पण, ते रस्त्यामध्ये येऊन अपघातास कारण ठरण्याची शक्यता आहे, असे १७० वृक्ष तोडावे लागणार आहेत. आता पर्यावरणप्रेमींच्या भावनांचा विचार करून फेरसर्वेक्षण सुरू केले आहे. यापैकी किती वृक्ष वाचविता येतील, याची माहिती घेतली जात आहे. सोबतच तोडलेल्या वृक्षांच्या तुलनेत जास्त वृक्ष लावले जाणार आहेत.

- गजानन टाके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.

ज्या महात्मा गांधींनी वृक्षांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याचा १५० वा जयंती महोत्सव वृक्षांची कत्तल करून साजरा करण्यात येत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण तो वृक्षतोड करून, पर्यावरणाला हानी पोहोचविणारा नसावा. याबाबत तात्काळ काय तो निर्णय घ्यावा, अन्यथा चिपको आंदोलन केले जाईल.- संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशन,वर्धा.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम