शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

वर्ध्यात केवळ १४ टक्के उद्योगांनी मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या अशा एकूण सुमारे ५५० उद्योगांमधील कामांना ब्रेक लागला. त्यानंतर शासनाने शिथिलता दिल्याने वर्धा जिल्ह्यातील सुमारे ८० मध्यम व मोठ्या उद्योगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी प्राप्त केली आहे. सद्यस्थितीत त्यापैकी ६० उद्योगांनी कामांना गती देण्यास सुरूवात केली आहे. याबाबतची नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्दे६० उद्योगांमध्ये कामाला गती : जाचक अटीमुळे जिल्ह्यातील अनेक उद्योग बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत उद्योग सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात केवळ १४ टक्केच उद्योगांनी २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. त्यापैकी केवळ ६० मध्यम व मोठ्या उद्योगांमध्ये कामाला गती देण्यात येत आहे.वर्धा जिल्ह्यात लघु, मध्यम व मोठे असे एकूण सुमारे ४,५०० उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये ३० हजारांवर कामगार कार्यरत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. उद्योगच बंद ठेवण्याची वेळ आल्याने उद्योगपतींवर आर्थिक संकट ओढवले आहे. सुरुवातीला २१ दिवसांचे लॉकडाऊन संपल्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आला. याच दरम्यान शासनाने काही जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी काही नियम व शर्ती क्रमप्राप्त केल्या. त्यासंदर्भातील परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले. शासनाकडून हीच शिथिलता दिल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या एकूण १३१ उद्योजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रितसर अर्ज दाखल केले. त्यापैकी काही उद्योजकांनी दोनवेळा तर काहींनी तीनवेळा अर्ज दाखल केल्याचे छानणीदरम्यान पुढे आले आहे. अर्ज छानणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ८० उद्योगांना सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोनाबाबत दक्षता घेण्याच्या नियम व अटींचे पालन करण्याच्या लेखी सूचना देत परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी ६० उद्योग सुरू झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.५५० मध्यम व मोठे उद्योगकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या अशा एकूण सुमारे ५५० उद्योगांमधील कामांना ब्रेक लागला. त्यानंतर शासनाने शिथिलता दिल्याने वर्धा जिल्ह्यातील सुमारे ८० मध्यम व मोठ्या उद्योगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी प्राप्त केली आहे. सद्यस्थितीत त्यापैकी ६० उद्योगांनी कामांना गती देण्यास सुरूवात केली आहे. याबाबतची नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे....म्हणून अर्जाची संख्या वाढलीजे उद्योजक आपला उद्योग लॉकडाऊनच्या काळात सुरू करू पाहत आहेत, अशांनी रितसर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्याचे आवाहन वर्धा जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासनाने शिथिलता दिल्यानंतर आतापर्यंत एकूण १३१ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेत. या अर्जांपैकी अनेक उद्योगांच्यावतीने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल होताच दोनवेळा, तर काहींनी तीनवेळा अर्ज सादर केला. त्यामुळे प्राप्त अर्जांची संख्या वाढली. परंतु, अर्ज छानणीदरम्यान ही बाब वर्धा जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. एकूणच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेले लॉकडाऊन मोठे आर्थिक संकटच घेऊन आले आहे. सरकारही त्यातून कसे सावरता येईल यासाठी रणनिती आखत आहे.लॉकडाऊनच्या काळातही उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे. शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करणाºयाना परवानगी देताना शासनाने काही जाचक अटी लादल्या आहेत. यामुळेच वर्धा जिल्ह्यातील नव्हे,तर राज्यातील उद्योजक परवानगी घेऊन उद्योग सुरू करण्याचा विषय टाळत आहेत. शासनाने जाचक अटी मागे घेतल्यास अनेकांना आपले उद्योग सुरू करता येईल. शिवाय कामगारांना रोजगार मिळेल.- प्रवीण हिवरे, अध्यक्ष, एम.आय.डी.सी. इंड्रस्ट्रियल असोसिएशन, वर्धा.

टॅग्स :MIDCएमआयडीसी