शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वाई नाल्याला आला पूर; गावाचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 5:00 AM

दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे. नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो. यामुळे वाहतूक ठप्प होते.

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : सततच्या पावसामुळे सालदरा तलावातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाने वाई येथील नाल्याला पूर आला आहे. परिणामी, पुलापलीकडील गावाचा संपर्क तुटला असून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे. नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो. यामुळे वाहतूक ठप्प होते. परिणामी पूर ओसरत पर्यंत प्रतिक्षा करावी लागते. ५ वर्षांपूर्वी  वसंत पुनवाटकर हा नागरिक याचपुलाला आलेल्या पुरात वाहून गेला असून त्याला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून पुलाची उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून कुणीही या गंभीर समस्येची दखल घेण्यात धन्यता मानली नाही. अखेर यंदाच्या पावसाळ्यातही सततच्या पावसाने पुलावरील वाहतूक ठप्प झाली असून गावाचा संपर्क तुटल्याने पूल उंच करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

माजी सरपंचांचा ठिय्यानागरिक पुलावरून जाण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी पाण्यातून पूल ओलांडू नये, यासाठी माजी सरपंच गणेश गचकेश्वर, पोलीस पाटील, कोतवाल आदींसह काही नागरिक नाल्याच्या बाजूला ठिय्या मांडून बसले असून नागरिकांना आवागमन करण्यास मज्जाव करीत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर