शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांवर ‘व्हायरल फ्लू’चा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:39 IST

झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ : शासकीय,खासगी रुग्णालये फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आजाराची लागण बच्चेकंपनीपासून वयोवृद्धांपर्यंत व्यक्तींना होत असून शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये फुल्ल झाल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.सध्याचे ढगाळी वातावरण हे अनेक आजारांसाठी पोषक ठरणारेच आहे. त्यातच झपाट्याने होणारे वातावरणातील बदल हे विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून त्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजार डोके वर काढत आहेत. त्यातच सध्या व्हायरल फ्ल्यूमुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. शहरातील प्रत्येक घरी व्हायरल फ्ल्यूचे एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहे. डोके व अंग दुखी, अंगात थंडी भरून ताप येणे आदी व्हायरल फ्ल्यूची लक्षणे आहेत. या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला अंग व डोकेदुचीच्या बेदना सहन कराव्या लागतात. चार ते पाच दिवस असणाऱ्या या तापाचा मुक्काम आता वाढला असून तो आठवड्याभऱ्याचा झाला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे विषाणू संसर्गामुळे होणाºया व्हायरल तापाचे स्वरूप आता बदलले,असे म्हटल्यास वावगे ठरू नये.तापाची लक्षणेसुरूवातीला असह्य असणाऱ्या डोके व अंगदुखीचा त्रास रुग्णाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच रुग्णाला अंगात थंडी भरून ताप येतो. अंगात थंडी भरून आलेला ताप आलटून-पालटून येतो. या तापाची लक्षणे आढळल्यास रुग्णाने तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे सांगण्यात येते.तापाचा मुक्काम वाढलाविषाणू संसर्गामुळे होणाऱ्या व्हायरल फ्लूचे स्वरूप आता वेगाने बदलले असल्याचे दिसून येते. यामुळे पूर्वी चार ते पाच दिवस असणाऱ्या तापाचा मुक्काम आता आठ ते दहा दिवसांवर आला आहे. शहरातील वाढते प्रदुषण, विचित्र वातावरण आणि जंतुसंसर्गामुळे वर्धेत या तापाचा जोर वाढला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शिवाय नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.व्हायरल फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात बऱ्यापैकी दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने आपण शनिवारी दुपारी लोकप्रतिनिधींसह खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत व्हायरल फ्लूला अटकाव करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. व्हायरल फ्लूची कुठलीही लक्षणे आढल्यास रुग्णाने घरगुती उपचार न करता तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.- पुरूषोत्तम मडावी,जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू