शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकरी संघटनेची महावितरणच्या कार्यालयावर धडक, भारनियमनासह रेटल्या शेतक-यांच्या विविध मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 3:46 PM

वर्धा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

वर्धा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भारनियमनाच्या वेळापत्रकात तात्काळ बदल करण्यात यावा यासह शेतक-यांच्या विविध मागण्या महावितरणच्या अधिका-यांकडे रेटून लावल्या होत्या.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून निघालेल्या मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बोरगाव (मेघे) भागातील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडकला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना महावितरणच्या कार्यालयाच्या मुख्य द्वारावर अडविले. त्यानंतर आंदोलनाची माहिती महावितरणच्या अधिका-यांना देण्यात आली. महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे यावेळी कार्यालयात गैरहजर असल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी महावितरणचे सदावर्ते व उरकुडे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागांत महावितरणच्या वतीने सध्या सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे किंवा शेतक-यांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सोईचे होईल, अशा पद्धतीने भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, जिल्ह्यातील सर्वच कृषीपंपांना दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, थकबाकी असल्याचे कारण पुढे करून कृषीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असून, हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा, अनेक शेतक-यांना सरासरी काढून विद्युत देयके दिली जात आहेत. महावितरणाच्या कर्मचा-यांकडून प्रत्येक कृषी मीटरचे रीडिंग घेत शेतक-यांना योग्य देयके देण्यात यावी आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या. आंदोलनात मधुसुदन हरणे, शैला देशपांडे, सतीश दाणी, गंगाधर मुटे, उल्हास कोटंबकर, सचिन डाफ, अरविंद बोरकर, राऊत, शांताराम भालेराव, प्रकाश जिकार, खुशाल हिवरकर, प्रमोद तलमले, मंगेश मानकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात केल्या घोषणामोर्चा बोरगाव (मेघे) परिसरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालय येथे येताच पोलिसांनी तो मुख्य प्रवेशद्वारावर अडविला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

टॅग्स :Farmerशेतकरी