अवकाळी पावसाने ७,४४५ शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:31+5:30

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ४ कोटी ४४ लाख ४ हजार ६७४ रुपयांच्या घरात असून सदर रक्कमेची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने १२ शेतकऱ्यांच्या ४.८० हेक्टरवरील पिकांचा फडशा पाडला.

Untimely rains have broken the backs of 7,445 farmers | अवकाळी पावसाने ७,४४५ शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

अवकाळी पावसाने ७,४४५ शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

ठळक मुद्दे३४६३.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाने ७ हजार ४४५ शेतकऱ्यांच्या एकूण ३४६३.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आले असले तरी अद्यापही शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आलेली नाही.
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ४ कोटी ४४ लाख ४ हजार ६७४ रुपयांच्या घरात असून सदर रक्कमेची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने १२ शेतकऱ्यांच्या ४.८० हेक्टरवरील पिकांचा फडशा पाडला. हे नुकसान ६४ हजार ८०० रुपयांच्या घरात असल्याने सदर रक्कमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १०३ शेतकऱ्यांचे ४१.७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसान ६ लाख २७० रुपयांच्या घरात असून या रक्कमेची मागणीही जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. गत तीन महिन्यात अवकाळी पावसामुळे एकूण ७ हजार ४४५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून नुकसान भरपाईपोटी मागणी करण्यात आलेल्या ४ कोटी ५० लाख ६९ हजार ७४४ रुपयांचा निधीच शासनाने वर्धा जिल्हा प्रशासनाला दिला नसल्याने शेतकरीही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हा निधी वेळीच वर्धा जिल्हा प्रशासनाला देणे गरजेचे आहे.

Web Title: Untimely rains have broken the backs of 7,445 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.