शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 18:21 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवालजिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे सादर

वर्धा : जिल्ह्यात ८ आणि ९ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे ३,०५४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून, ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात १ जानेवारीपासूनच पावसाळी वातावरण बनलेले होते. त्यातच ८ आणि ९ जानेवारी रोजी दोन दिवस तुफानी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. प्रामुख्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, १,७६५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आर्वी तालुक्यात ५६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कारंजा तालुक्यात ७२७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. गव्हाचे २८९ हेक्टरवर नुकसान झाले असून, हरभरा १,१९६ हेक्टर, कापूस ८४ हेक्टर, तूर ७५९ हेक्टर, ऊस ३ हेक्टर, फळपिके ६६६ हेक्टर, भाजीपाला १ हेक्टर तसेच इतर पिकांचे ५६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. पिके पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी संकटात आले आहेत.

पावसाने मांडले ठाण

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले. सततच्या पावसामुळे गहू, हरभरा सोंगणीचे काम लांबणीवर पडले आहे. सोंगणी केलेले पीक शेतात ओले झाले आहे. तर अशा वातावरणामुळे फळांच्या दरांवरही परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

३३ टक्क्यांवर झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका   -   नुकसान क्षेत्र

आर्वी      -     ५६२

आष्टी      -       १,७६५

कारंजा   -         ७२७

पिकांचे झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका गावे शेतकरी गहू हरभरा कापूस तूर फळपिके

आर्वी - ११ ८९८ २४ २६४ ८४ १७८ १२

आष्टी - २२ १९३९ १११ ८३० ०० ५८१ १८७

कारंजा - १९ ९४६ १५४ १०२ ०० ०० ४६७

५२ गावांतील ३,७८३ कुुटुंबं बाधित

८ व ९ जानेवारी रोजी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच तिन्ही तालुक्यातील ५२ गावांतील तब्बल ३ हजार ७८३ कुटुंबं बाधित झाली असून, त्यांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसHailstormगारपीटweatherहवामानFarmerशेतकरी