शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 18:21 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवालजिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे सादर

वर्धा : जिल्ह्यात ८ आणि ९ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे ३,०५४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून, ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात १ जानेवारीपासूनच पावसाळी वातावरण बनलेले होते. त्यातच ८ आणि ९ जानेवारी रोजी दोन दिवस तुफानी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. प्रामुख्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, १,७६५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आर्वी तालुक्यात ५६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कारंजा तालुक्यात ७२७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. गव्हाचे २८९ हेक्टरवर नुकसान झाले असून, हरभरा १,१९६ हेक्टर, कापूस ८४ हेक्टर, तूर ७५९ हेक्टर, ऊस ३ हेक्टर, फळपिके ६६६ हेक्टर, भाजीपाला १ हेक्टर तसेच इतर पिकांचे ५६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. पिके पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी संकटात आले आहेत.

पावसाने मांडले ठाण

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले. सततच्या पावसामुळे गहू, हरभरा सोंगणीचे काम लांबणीवर पडले आहे. सोंगणी केलेले पीक शेतात ओले झाले आहे. तर अशा वातावरणामुळे फळांच्या दरांवरही परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

३३ टक्क्यांवर झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका   -   नुकसान क्षेत्र

आर्वी      -     ५६२

आष्टी      -       १,७६५

कारंजा   -         ७२७

पिकांचे झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका गावे शेतकरी गहू हरभरा कापूस तूर फळपिके

आर्वी - ११ ८९८ २४ २६४ ८४ १७८ १२

आष्टी - २२ १९३९ १११ ८३० ०० ५८१ १८७

कारंजा - १९ ९४६ १५४ १०२ ०० ०० ४६७

५२ गावांतील ३,७८३ कुुटुंबं बाधित

८ व ९ जानेवारी रोजी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच तिन्ही तालुक्यातील ५२ गावांतील तब्बल ३ हजार ७८३ कुटुंबं बाधित झाली असून, त्यांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसHailstormगारपीटweatherहवामानFarmerशेतकरी