शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 18:21 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवालजिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे सादर

वर्धा : जिल्ह्यात ८ आणि ९ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे ३,०५४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून, ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात १ जानेवारीपासूनच पावसाळी वातावरण बनलेले होते. त्यातच ८ आणि ९ जानेवारी रोजी दोन दिवस तुफानी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. प्रामुख्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, १,७६५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आर्वी तालुक्यात ५६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कारंजा तालुक्यात ७२७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. गव्हाचे २८९ हेक्टरवर नुकसान झाले असून, हरभरा १,१९६ हेक्टर, कापूस ८४ हेक्टर, तूर ७५९ हेक्टर, ऊस ३ हेक्टर, फळपिके ६६६ हेक्टर, भाजीपाला १ हेक्टर तसेच इतर पिकांचे ५६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. पिके पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी संकटात आले आहेत.

पावसाने मांडले ठाण

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले. सततच्या पावसामुळे गहू, हरभरा सोंगणीचे काम लांबणीवर पडले आहे. सोंगणी केलेले पीक शेतात ओले झाले आहे. तर अशा वातावरणामुळे फळांच्या दरांवरही परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

३३ टक्क्यांवर झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका   -   नुकसान क्षेत्र

आर्वी      -     ५६२

आष्टी      -       १,७६५

कारंजा   -         ७२७

पिकांचे झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका गावे शेतकरी गहू हरभरा कापूस तूर फळपिके

आर्वी - ११ ८९८ २४ २६४ ८४ १७८ १२

आष्टी - २२ १९३९ १११ ८३० ०० ५८१ १८७

कारंजा - १९ ९४६ १५४ १०२ ०० ०० ४६७

५२ गावांतील ३,७८३ कुुटुंबं बाधित

८ व ९ जानेवारी रोजी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच तिन्ही तालुक्यातील ५२ गावांतील तब्बल ३ हजार ७८३ कुटुंबं बाधित झाली असून, त्यांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसHailstormगारपीटweatherहवामानFarmerशेतकरी