शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७ ग्रा.पं.मधील पाणी पिण्यास अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:15 IST

पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देस्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा : ग्रा.पं. प्रशासनाकडून कार्यवाहीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. इतकेच नव्हे तर १७ गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा असल्याचे या पाहणीत पुढे आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे निरोगी आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेवून त्या-त्या ग्रा.पं. प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ७४ ग्रा.पं., देवळीमध्ये ६३, सेलू ६२, आर्वी ६९, आष्टी ४१, कारंजा (घा.) ५९, हिंगणघाट ७६ तर समुद्रपूर तालुक्यात ७० ग्रा. पं. आहेत. या ५१४ ग्रा. पं. मध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे एकूण २ हजार ८८६ स्त्रोत आहेत. या स्त्रातातील पाणी त्या-त्या गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात. ज्या स्त्रोताचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात त्या स्त्राताच्या परिसरात अस्वच्छता नसने क्रमप्राप्त आहे; पण सध्यास्थितीत जिल्ह्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा आहे. यात देवळी तालुक्यातील पाच, सेल पाच, आर्वी सहा तर आष्टी तालुक्यातील एका गावाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सदर गावांमधील लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देत तात्काळ योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. तर नागरिकांनीही पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी उकळून थंड करूनच तसचे चाळून पिणे गरजेचे आहे.१७ ग्रा.पं.तील पाण्याच्या स्त्रोतांना ग्रिनकार्डजिल्ह्यातील ३४ ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या आवारात अस्वच्छता दिसून असल्याने जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाने त्या पाण्याच्या स्त्रोताबाबत संबंधित ग्रा.पं.ना पिवळे कार्ड दिले होते. त्यानंतर जि.प. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांना केंद्रस्थानी ठेवून सदर ग्रा.पं.तील काही ग्रा.पं.नी योग्य उपाययोजना केल्याने त्यापैकी १७ ग्रा.पं.ना ग्रिन कार्ड देण्यात आले आहे.मनुष्याच्या शरीरात ६० टक्के पाणीचपृथ्वी तलावरील केवळ ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे. इतकेच नव्हे तर मनुष्याच्या शरीर वजनाच्या ६० टक्के वजन हे पाण्याचे असते. पेशी जीवंत ठेवणे, शरीरातील द्रव्य पदार्थांचे वहन, अन्नाचे चयपचाय, शरीराचे तापमान थंड ठेवणे, उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात रोगजंतू, पाण्याला दुर्गंधी तसेच रसायनिक प्रदुषक नसावे, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण