शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

जिल्ह्यातील १७ ग्रा.पं.मधील पाणी पिण्यास अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:15 IST

पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देस्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा : ग्रा.पं. प्रशासनाकडून कार्यवाहीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. इतकेच नव्हे तर १७ गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा असल्याचे या पाहणीत पुढे आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे निरोगी आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेवून त्या-त्या ग्रा.पं. प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ७४ ग्रा.पं., देवळीमध्ये ६३, सेलू ६२, आर्वी ६९, आष्टी ४१, कारंजा (घा.) ५९, हिंगणघाट ७६ तर समुद्रपूर तालुक्यात ७० ग्रा. पं. आहेत. या ५१४ ग्रा. पं. मध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे एकूण २ हजार ८८६ स्त्रोत आहेत. या स्त्रातातील पाणी त्या-त्या गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात. ज्या स्त्रोताचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात त्या स्त्राताच्या परिसरात अस्वच्छता नसने क्रमप्राप्त आहे; पण सध्यास्थितीत जिल्ह्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा आहे. यात देवळी तालुक्यातील पाच, सेल पाच, आर्वी सहा तर आष्टी तालुक्यातील एका गावाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सदर गावांमधील लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देत तात्काळ योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. तर नागरिकांनीही पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी उकळून थंड करूनच तसचे चाळून पिणे गरजेचे आहे.१७ ग्रा.पं.तील पाण्याच्या स्त्रोतांना ग्रिनकार्डजिल्ह्यातील ३४ ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या आवारात अस्वच्छता दिसून असल्याने जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाने त्या पाण्याच्या स्त्रोताबाबत संबंधित ग्रा.पं.ना पिवळे कार्ड दिले होते. त्यानंतर जि.प. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांना केंद्रस्थानी ठेवून सदर ग्रा.पं.तील काही ग्रा.पं.नी योग्य उपाययोजना केल्याने त्यापैकी १७ ग्रा.पं.ना ग्रिन कार्ड देण्यात आले आहे.मनुष्याच्या शरीरात ६० टक्के पाणीचपृथ्वी तलावरील केवळ ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे. इतकेच नव्हे तर मनुष्याच्या शरीर वजनाच्या ६० टक्के वजन हे पाण्याचे असते. पेशी जीवंत ठेवणे, शरीरातील द्रव्य पदार्थांचे वहन, अन्नाचे चयपचाय, शरीराचे तापमान थंड ठेवणे, उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात रोगजंतू, पाण्याला दुर्गंधी तसेच रसायनिक प्रदुषक नसावे, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण