शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:30 IST

येथील महामार्ग ६ वरील पेट्रोलपंपा समोर कार व दुचाकीच्या अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहामार्ग ६ वरील घटना : एका जखमीवर नागपूरात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : येथील महामार्ग ६ वरील पेट्रोलपंपा समोर कार व दुचाकीच्या अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात दुपारी चार वाजता झाला असून कार मधील पाच प्रवासी थोडक्यात बचावले.प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३२ एच. ९५२४ क्रमांकाच्या दुचाकीने तिघे जण कारंजाकडून महामार्गावरील पेट्रोलपंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी जात होते. पेट्रोलपंप उजव्या बाजूला असल्याने दुचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन उजवीकडे वळविली असता कोंढाळीकडून येणाऱ्या एम. एच. ३२ सी.९०२४ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात होताच कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याकडेला असलेल्या शेतात घूसली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला व कारचेही नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील अमोल दुपारे (२४) रा इंदिरानगर कारंजा याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या सोनू उर्फ अमर श्रीरामे (२५) व सतीश कालभूत (२४) रा. सेलगाव याला सुरूवातीला कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती सोनू उर्फ अमर श्रीराम याला वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले. तर सतीश याची प्रकृती नाजूक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. लक्ष्मण भलावी, मनिषा लक्ष्मण भलावी, मुलगाव अभय (११), मुलगी नंदीनी (९) व बहिण कविता सलाम (४०) हे कार मध्ये होते. ते एका घरगुती कार्यक्रमासाठी शिवा (अडेगाव) ता. काटोल येथून आष्टीला बहिणीकडे जात होते. दरम्यान हा अपघात झाला असून ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद कांरजा पोलिसांनी घेतली आहे.ट्रकने दुचाकी चालकास चिरडलेवर्धा : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात शहरानजीकच्या शांतीनगर चौकात शुक्रवारी सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास झाला. माधव हनुमान ठाकरे (२४) रा. उमरी (मेघे) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, मृतक माधव ठाकरे व रामदास चरडे रा. उमरी हे कामासाठी वर्धेच्या दिशेने जात होते. सायकने वर्धा शहरात पोहोचलेला रामदास चरडे भरपूर वेळ होऊनही माधव न पोहोचल्याने आणि त्याच्याशी मोबाईलवर संपर्क न होत असल्याने पुन्हा गावाच्या दिशेने निघाला. त्यावेळी त्याला शांतीनगर परिसरात अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्याने बारकाईने पाहणी केली असता माधव हा जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याने दिसून आले. त्याने घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देताच सहाय्यक फौजदार शंकर भलावी यांनी आपल्या चमुसह घटना स्थळ गाठून जखमीला मिळेल त्या वाहनाने सावंगी रुग्णालयाकडे रवाना केले. तेथे उपचारादरम्यान माधवचा मृत्यू झाला. माधव हा एम.एच. ३२ व्ही. ४९८० क्रमांकाच्या दुचाकीने वर्धेकडे येत असता त्याला भरधाव असलेल्या डब्ल्यू. बी. १५ बी. ७३४९ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू