शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

गोंडी गीतांनी उजाडली आदिवासी पहाट

By admin | Updated: April 27, 2016 02:23 IST

आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेला गोंडीबोलीचे जणू वरदान लाभले आहे. समृद्ध वनसंपदेच्या सानिध्यात राहून

अजय मसराम यांच्या गीतांची मैफल : गाण्यांमधून केले ज्वलंत प्रश्नांवर भाष्यवर्धा : आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेला गोंडीबोलीचे जणू वरदान लाभले आहे. समृद्ध वनसंपदेच्या सानिध्यात राहून टक्केटोणपे खाल्लेल्या म्हणजे संगीतशास्त्राच्या भाषेत रियाज पूर्ण झालेल्या गोंडीबोलीतून पारंपरिक गीतांचे सादरीकरण झाले की, कुणाचीही पावले थिरकायला लागतात. मात्र या थिरकण्याने आयुष्यातील अंधार दूर होणार नाही. त्याला प्रबोधनाचीच गरज आहे. याच जाणिवेतून नागपुरातील प्रसिद्ध आदिवासी गायक अजय मसराम यांच्या प्रबोधन गीतांची मैफल स्थानिक आयटीआय टेकडीवरील बिरसा मुंडा क्रीडा संकुलात रविवारी पहाटे आयोजित करण्यात आली होती.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर, सेवानिवृत्त विक्रीकर आयुक्त ज्ञानेश्वर मडावी, जंगल कामगार सहकारी संस्थेचे बापूराव उईके, नगरसेवक शरद आडे, ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव मडावी, वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष राजू मडावी, हरिदास टेकाम, चंद्रभान खंडाते व इतर मान्यवर उपस्थित होते. अजय मसराम यांनी या मैफलीत २५ गोंडीगीते सादर केली. आदिवासींची संस्कृती, बोलीभाषेचा ऱ्हास, शहरीकरणामुळे हरवलेली आदिवासी मुल्ये, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, राजकीय नेत्यांची खोटी आश्वासने, युवकांची व्यवसनाधिनता, वनकायद्यामुळे आदिवासींवर आलेल्या मर्यादा, पुनर्वसनाचे प्रश्न, कल्याण योजना राबविताना शासकीय अधिकाऱ्यांनी बेपर्वाई, आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वसमाजाकडेच केलेले दुर्लक्ष आदी विषयांवर अजय मसराम यांनी गोंडी गीतांच्या माध्यमातून प्रकाश टाकला. याशिवाय शहीद बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, वरी बाबूराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व पारीकुपार लिंगो यासारख्या पुरोगामी, परिवर्तनवादी महापुरूषांचे जीवनकार्य गीतांमधून सांगितले. शिक्षण घेऊन आधुनिक विचारांचा स्वीकार करा, मात्र संस्कृती विसरू नका, असे आवाहन मसराम यांनी केले. या प्रबोधन मैफलीला संगीत पुरकाम, रोहित बिसेन, गौरव किरनाके, रमेश युनाती, अरविंद मसराम, गोलू उईके, गजानन उईके, मनीष किरनाके यांनी संगीताची सुमधूर साथ दिली. प्रारंभी आयोजक राजू मडावी यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्त झाल्याबद्दल मोहन मसराम व उईके यांचा सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीचे चंद्रभान खंडाते, विजय म्हरस्कोल्हे, अशोक धुर्वे, मोहन मसराम, शंकर म्हरस्कोल्हे, नंदकिशोर बिसेन, राजेंद्र मसराम, द्वारका प्रसाद राऊत, राजेंद्र मडावी, केशव सयाम, केशव पुरके, दादा इवनाते, शंकर उईके, भरत कोवे, संजय कोहचडे, पुंडलिक परतेकी, सुनील सलामे, हरिहर पेंदामकर, सुनील मसराम, अशोक कोडापे, दिगंबर पेंदाम, किसन कौरती, ज्ञानेश्वर उईके, वर्षा टेकाम, गंगाधर उईके, विठ्ठल इवनाथे, सुखदेव आत्राम आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)