शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
5
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
6
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
7
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
8
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
9
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
10
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
11
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
12
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
13
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
14
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
15
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
16
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
17
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
18
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
19
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
20
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश

हजारो क्विंटल तुरीला आली मोड

By admin | Updated: June 12, 2017 01:53 IST

नाफेडनंतर शासनासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ राज्यात तूर खरेदी करीत आहे; पण यात गोंधळाची स्थिती असल्याने ....

बाजार समितीत दुर्गंधी : नियोजनाच्या अभावामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नाफेडनंतर शासनासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ राज्यात तूर खरेदी करीत आहे; पण यात गोंधळाची स्थिती असल्याने लाखो रुपयांच्या तुरी सडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो क्विंटल तुरीला मोड आली आहे. पोत्यातच तुरीला कोंब फुटल्याने बाजार समितीत दुर्गंधी पसरली आहे. शासकीय तूर खरेदीचा बाजार समित्यांमध्ये गोंधळ पाहावयास मिळतो. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर बाजारात आणली; पण तोकड्या व्यवस्थेमुळे तब्बल १५ ते २० दिवसांनी मोजमाप व खरेदी होत होती. मान्सूनपूर्व पावसाचे नियोजन करण्यात आले नाही. परिणामी, गोंधळ आणखी वाढला. मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे आवारात असलेल्या तुरीला पोत्यांतच मोड आली आहे. यात सुमारे ४०० ते ५०० क्विंटल तुरी खराब झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर नाफेड, एफसीआय आणि पणन महासंघाने आतापर्यंत नाकारली. चाळणीने गाळून तूर स्वीकारण्यात आली. आता हजारो क्विंटल तूर पावसामुळे सडत आहे. मग, या नुकसानाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पणन महासंघ तुरीची खरेदी तर करीत आहे; पण गोदामांची व्यवस्थाच करण्यात आली नाही. वर्धेत खरेदी केलेल्या तुरी दीडशे किमीच्या वर अंतर ब्रह्मपुरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात साठविल्या जात आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थाही तोकडीच आहे. परिणामी, हजारो क्विंटलचा खरेदी केलेला माल बाजार समितीच्या आवारातच पडून आहे. सुमारे ११ हजार ५०० क्विंटल तूर शेडमध्ये व आवारात आहे. यापैकी अर्धी तूर उचलण्यात आली असली तरी ५०० क्विंटलच्या वर तुरीला मोड आली आहे. शेतकऱ्यांची तूर गुणवत्ता नसल्याचे कारण देत नाकारण्यात आली असताना खरेदी केलेली तूर मात्र सडत आहे. यार्डात सुमारे ५०० क्विंटल तूर खुल्या आवारात शिल्लक आहे तर शेडमध्ये असलेली हजारो क्विंटल तूर खालच्या भागातून पाणी लागत असल्याने धोक्यात आली आहे. पाच शेडमध्ये असलेली सुमारे सात ते आठ हजार क्विंटल तुरीची लगेच उचल केली नाही तर ती देखील सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा मार्केटींग अधिकारी, खरेदी-विक्री संघाद्वारे अद्याप गोदामांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शिवाय वाहतूक व्यवस्थाही नाही. परिणामी, शासनाला तूर खरेदीत कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गोदामांची व्यवस्था होत असताना पणन महासंघाकडून पुढाकार घेतला जात नसल्याचेही बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. करारानुसार त्याच दिवशी माल उचलणे गरजेचेकृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर महाराष्ट्र राज्य पणन महासंघामार्फत तुरीची खरेदी करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणली; पण खरेदीसाठी तब्बल १५ ते २० दिवस बाजार समितीतच मुक्काम ठोकावा लागला. अत्यंत धिम्यागतीने खरेदीची प्रक्रिया राबविली गेली. शिवाय खरेदी केलेला माल त्वरित उचललाही गेला नाही. यामुळे बाजार समितीच्या पाचही शेडमध्ये खरेदी केलेली तूर ठेवण्यात आली आहे. पणन महासंघाने तब्बल १३ हजार ८०० क्विंटल तुरीची खरेदी केली; पण तोकड्या वाहतूक व्यवस्थेमुळे तथा गोदाम रिक्त नसल्याने तो माल बाजार समितीतच पडून आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात तुरीची नासाडी होत आहे. तीन ते चार दिवसांच्या पावसामुळे ५०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीला मोड आली असून शेडमधील खाली असलेले पोतेही पाणी लागत असल्याने सडण्याची शक्यता खरेदी-विक्री संघाचे कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे. यामुळे तुरीची त्वरित उचल करणे गरजेचे आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना सेवा देण्यास बाध्य आहे, खरेदीदारांना नव्हे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनशी झालेल्या तूर खरेदीच्या करारात याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांची व्यवस्था त्यांना करावयाची आहे. खरेदी केलेला माल त्याच दिवशी उचलणे, ही त्यांची जबाबदारी आहे. असे असले तरी गोदाम रिकामे नसल्याने बाजार समितीने त्यांना पाचही शेड उपलब्ध करून दिले. शिवाय पावसाचा धोका असल्याने दोन दिवस ताडपत्री दिल्या. शिवाय सात-आठ हजार रुपयांचे प्लास्टिक खरेदी करून देण्यात आले. त्यांनी खरेदी केलेला माल गोदामातून परत येत आहे. बाजार समितीने अन्य गोदाम संचालकांशी डीएमओचा संपर्क करून दिला; पण माल उचलण्यात आला नाही. सर्वत्र खरेदी करण्यात आलेली तूर असल्याने अन्य व्यवहार बंद आहे.- समीर पेंडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.महाराष्ट्र राज्य पणन महासंघाची अधिकृत तूर खरेदी सुरू आहे. खुल्या यार्डमध्ये ३०० ते ४०० पोते ओले झालेत. ते पोते पलटवून सुरक्षित ठिकाणी ठेवत आहोत. यार्डवर ताडपत्री, गोदाम आदींची व्यवस्था नसल्याने माल ओला होत आहे. ताडपत्री दोन दिवसांसाठी पुरविण्यात आल्या. दर अधिक असल्याने ताडपत्री अधिक दिवस देऊ शकत नसल्याचे सांगत बाजार समितीने प्लास्टिक दिले; पण ते पुरेसे नाही. माल उचलण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने आणि खरेदी अधिक होत असल्याने नुकसान होत आहे. आणखी सात-आठ हजार क्विंटल माल असून तोही खराब होण्याची शक्यता आहे. तत्सम पत्रही देण्यात आले आहे. - अशोक रणनवरे, कर्मचारी, खरेदी-विक्री संघ, वर्धा.