शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामात खादीच्या राख्यांची परंपरा कायम

By admin | Updated: August 29, 2015 02:14 IST

भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला महत्त्व आहे. या सणाकरिता बाजारात विविध आकारातील राख्या येत असतात;...

५०० राख्यांची निर्मिती: महात्मा गांधींच्या विचारानुसार शिक्षणाचा प्रयत्नदिलीप चव्हाण सेवाग्रामभारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला महत्त्व आहे. या सणाकरिता बाजारात विविध आकारातील राख्या येत असतात; मात्र महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम आश्रमात खादीच्या सूताच्या राख्या तयार करून त्या बांधण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ती आताही कायम असल्याचे चित्र आहे. येथील आनंद निकेतन विद्यालयामध्ये विद्यार्थी सूतापासून तयार केलली राखी बांधून रक्षाबंधन साजरे करीत असल्याचे दिसून आले आहे. सन १९३८ पासून महात्मा गांधीजींच्या विचार तत्त्वावर आणि अध्ययनावरून नव्या शिक्षण प्रयोगाला प्रारंभ झाला. याची संपूर्ण जबाबदारी इ.डब्ल्यू आर्यनायकम व आशादेवी या दाम्पत्यावर होती. हिंदुस्थानी तालिमी संघ नंतर नई तालिम व आताचा आनंद निकेतन असा थोडा बदल झाला. नई तालीम ही शिक्षण पद्धती नसून संपूर्ण जीवन शैलीची विचारधारा आहे. अहिंसक समाज रचनेतून आदर्श नागरिक निर्माण होवू शकतात. कामाद्वारे शिक्षण प्रणाली असली तरी यात सांस्कृतिक आणि कलेला फार महत्त्व आहे. आपल्या संस्कृती व सणांचे ज्ञान विविध कार्यक्रम व सणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत होते. रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने शाळेतच नव्हे तर संस्थेत साजरा केल्या जात होता. शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी खादी सुताला रंग देणे, साधी तसेच रंगीत राख्या बनविण्यात मग्न होवून जातात. काही तर आपल्या कल्पकतेने सुंदर राख्या बनवून शाबासकीही मिळवितात. रक्षाबंधनदिनी गाणी गायली जातात. विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यकर्त्यांना राखी बांधून या सणाचे महत्त्व विषद केल्या जात होते. समिती आणि आनंद निकेतन विद्यालयाने ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. १५ दिवसांपासून सूतकताईला प्रारंभ सेवाग्राम आश्रम परिसरात असलेल्या आनंद निकेतन येथे राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला रक्षाबंधनाच्या १५ दिवसांपूर्वीपासून सुरुवात होते. यात शाळेतील वर्ग ३ ते ९ पर्यंतचे सर्वच विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सूताच्या माध्यमातून राख्या तयार करण्यात येत असतात. या राख्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता विक्रीकरिता ठेवण्यात आल्या आहेत. या राख्या १० ते २० रुपयांपर्यंत विक्रीला ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा विद्यार्थ्यांनी ५०० राख्या तयार केल्या आहेत. त्यापैकी ३०० राख्या विकल्या गेल्याचे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका असा संदेशही दिल्या जात आहे.