शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

९०६ शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रीडांगणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण १ हजार २४८ शाळा आहेत. यापैकी केवळ ३४२ शाळांकडे मैदाने आहेत तर तब्बल ९०६ शाळा, महाविद्यालय, शाळांकडे मैदान नाही. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, क्रीडांगण नसतानाही या शाळांवर शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी खेळापासून वंचित : शिक्षण संस्थांनी दडवली माहिती

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, याकरीता शिक्षण विभागाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुणही विकसित करण्याकरीता शाळा, महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांकडे मैदाने असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील सुमारे ९०६ शाळा, महाविद्यालय, प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना स्वत:चे क्रीडांगण नसल्याने येथील विद्यार्थ्यांना खेळण्यापासून वंचित तर राहावे लागत आहे.जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण १ हजार २४८ शाळा आहेत. यापैकी केवळ ३४२ शाळांकडे मैदाने आहेत तर तब्बल ९०६ शाळा, महाविद्यालय, शाळांकडे मैदान नाही. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, क्रीडांगण नसतानाही या शाळांवर शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शाळांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शाळा व्यवस्थापनावर बंधनकारक आहे. शाळांकरीता वर्गखोल्या, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, संरक्षक भिंत, उताराचा रस्ता, खेळाचे मैदान आदी मुलभूत सुविधांबाबतचे निकष आहेत. मात्र, यातील मैदानाच्या निकषाची पूर्तता करताना अनेक शाळांनी पळवाट शोधून, कायद्याच्या चौकटीतून आपली सुटका करुन घेतली आहे.भाडेतत्त्वावर व मोकळ्या जागांचे करार करून, अशा जागा खेळासाठी मैदान म्हणून वापरत असल्याचे अनेक शाळांनी दाखविले आहे. प्रत्यक्षात स्वमालकीच्या जागा असलेल्या शाळांची संख्या कमी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शाळांकडे मैदान नसल्यामुळे जिल्ह्यातील शाळा शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.यामुळे जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला बाधा पोहोचविण्याचेही काम या शिक्षण संस्था करीत असल्याने त्या संस्थांची तपासणी करुन त्यांना क्रीडांगणे उपलब्ध करुन देणे बंधकारक करण्याची मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे.११७ शाळांच्या क्रीडांगणास कुंपणाचा अभावजिल्ह्यात एकूण ३४२ शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आदींकडे स्वत:ची मैदाने आहेत पण; या मैदानामध्ये तब्बल ११७ शाळेतील मैदानांना कुंपण नाही. त्यामुळे विद्यार्थी खेळाडूंना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.असे असावे मैदान...राष्ट्रीय भवन निर्माण संहिता २००५ नुसार अवघी ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये जागेच्या उपलब्धतेनूसार क्रीडांगणाचे क्षेत्र दोन हजार चौरस मीटर असावे. विद्यार्थी संख्या कमी असल्यास १८ मीटर बाय ३६ मीटरचे, म्हणजेच ६४८ चौरस मीटर इतके किमान क्षेत्रफळ असावे.उसनी मैदानेजिल्ह्यात माध्यमिक शाळांची संख्या १९७ असून यापैकी अनेक शाळांकडे स्वत:चे मैदान नाही. स्वत:चे मैदान नसलेल्या शाळांनी शिक्षण हक्क कायद्यातून पळवाट शोधून भाडेतत्त्वावर तर काहींनी मोकळे मैदान दाखवून ‘हे आमचेच’ असा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. उसनी मैदाने घेतलेल्या शाळांची सविस्तर माहिती मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे स्वत:चे मैदान नसलेल्या शाळांचा आकडाही खुप मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Schoolशाळा