शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

शेतकरी जागृत झाला तरच सरकार झोपेतून उठेल ! बच्चू कडू यांचे शेतकरी हक्क सभेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:12 IST

Vardha : सरकार फक्त उद्योगपती व मोठ्या लोकांना कर्जमाफी देत असल्याचा आरोप केला

लोकमत न्यूज नेटवर्कनंदोरी : शेतकरी आपल्या हितासाठी जागृत होणार नाही, तोपर्यंत सरकार झोपेतून उठणार नाही. सरकार फक्त उद्योगपती व मोठ्या लोकांना कर्जमाफी देते. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

शुक्रवारी नंदोरी येथे किसान हक्क सभेत ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. ते म्हणाले, सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये भाव असून एका शेतकऱ्याने पाचशे रुपये क्विंटलने सोयाबीन विकले. कापसाला ८ हजार ११० रुपये भाव असूनही शेतकऱ्यांना मिळत नाही. मोदी सरकारने विदेशातून २५ लाख गाठी भारतात आयात करण्याचे धोरण आखले असून हे धोरण शेतकऱ्याच्या जीवावर उठले आहे, असा आरोप त्यांनी केला.

सातबारा कधी कोरा करणार

शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान हे फसवे असून यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना जाती-जातींमध्ये वाटून घेणारं सरकार असून विदर्भवेगळा करण्याची भाषा बोलणारे विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री झाल्यावर विदर्भावर बोलत नाही. निवडणुकीच्या काळामध्ये सातबारा कोरा करतो म्हणणारे मुख्यमंत्री सातबारा केव्हा कोरा करणार, असा प्रश्न बच्चू कडू यांनी फडणवीस सरकारला केला. मंचावर गजू कुबडे, प्रवीण महाजन, प्रवीण हेडवे, देवा धोटे, प्रशांत गहुकर, महेश झोटिंग आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी केले, तर आभार देवा धोटे यांनी मानले.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २८ ऑक्टोबरला नागपुरात आंदोलन

कर्जमाफी व शेतकऱ्याच्या हक्कासाठी २८ ऑक्टोबरला नागपूर येथे शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन होणार आहे. यात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers' awakening needed for government action: Bachchu Kadu.

Web Summary : Bachchu Kadu stated that the government favors industrialists over farmers regarding loan waivers. He criticized policies like cotton imports and false subsidies, leading to farmer suicides. He announced a major farmers' protest in Nagpur on October 28 for loan waivers and farmers' rights.
टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरीfarmingशेतीVidarbhaविदर्भ