शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जागृत झाला तरच सरकार झोपेतून उठेल ! बच्चू कडू यांचे शेतकरी हक्क सभेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:12 IST

Vardha : सरकार फक्त उद्योगपती व मोठ्या लोकांना कर्जमाफी देत असल्याचा आरोप केला

लोकमत न्यूज नेटवर्कनंदोरी : शेतकरी आपल्या हितासाठी जागृत होणार नाही, तोपर्यंत सरकार झोपेतून उठणार नाही. सरकार फक्त उद्योगपती व मोठ्या लोकांना कर्जमाफी देते. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

शुक्रवारी नंदोरी येथे किसान हक्क सभेत ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. ते म्हणाले, सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये भाव असून एका शेतकऱ्याने पाचशे रुपये क्विंटलने सोयाबीन विकले. कापसाला ८ हजार ११० रुपये भाव असूनही शेतकऱ्यांना मिळत नाही. मोदी सरकारने विदेशातून २५ लाख गाठी भारतात आयात करण्याचे धोरण आखले असून हे धोरण शेतकऱ्याच्या जीवावर उठले आहे, असा आरोप त्यांनी केला.

सातबारा कधी कोरा करणार

शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान हे फसवे असून यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना जाती-जातींमध्ये वाटून घेणारं सरकार असून विदर्भवेगळा करण्याची भाषा बोलणारे विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री झाल्यावर विदर्भावर बोलत नाही. निवडणुकीच्या काळामध्ये सातबारा कोरा करतो म्हणणारे मुख्यमंत्री सातबारा केव्हा कोरा करणार, असा प्रश्न बच्चू कडू यांनी फडणवीस सरकारला केला. मंचावर गजू कुबडे, प्रवीण महाजन, प्रवीण हेडवे, देवा धोटे, प्रशांत गहुकर, महेश झोटिंग आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी केले, तर आभार देवा धोटे यांनी मानले.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २८ ऑक्टोबरला नागपुरात आंदोलन

कर्जमाफी व शेतकऱ्याच्या हक्कासाठी २८ ऑक्टोबरला नागपूर येथे शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन होणार आहे. यात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers' awakening needed for government action: Bachchu Kadu.

Web Summary : Bachchu Kadu stated that the government favors industrialists over farmers regarding loan waivers. He criticized policies like cotton imports and false subsidies, leading to farmer suicides. He announced a major farmers' protest in Nagpur on October 28 for loan waivers and farmers' rights.
टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरीfarmingशेतीVidarbhaविदर्भ