शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले रामनगर लीजचा प्रश्न त्वरित निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 22:39 IST

ना. फडणवीस यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन शासन आदेश काढण्यात येईल, अशी घोषणा केली. अवघ्या दोन दिवसांतच वर्धेकरांना दिलेल्या आश्वासनावर विचार होत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी ४ ऑक्टोबरला लीजच्या नूतनीकरणासंदर्भात शासन आदेश काढला आहे. या आदेशामुळे रामनगर येथील लीजधारकांच्या लीजचे २०५१ पर्यंत नूतनीकरण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेला वर्धा शहरातील रामनगर लीजचा प्रश्न अखेर निकाली निघाला. ही समस्या निकाली निघावी म्हणून आ. डॉ. पंकज भोयर यांनी पाठपुरवा करीत तशी मागणी गांधी जयंतीला वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ही समस्या लवकरच निकाली काढू, असे आवाश्वानही ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तर आता त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून ३० वर्षांसाठी मुदत वाढविण्यात आली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीसच्या या निर्णयामुळे रामनगरवासीयांना दिलासाच मिळाला आहे. विशेष म्हणजे लीज नृतनीकरणा अभावी रामनगरवासीयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पण आता समस्या निकाली निघणार आहे. 

भोयर यांनी २०१५ मध्येही केला होता पाठपुरावा-    राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत वर्धा शहरातील रामनगर परिसरातील लीज नूतनीकरणाचा प्रश्न शासन दरबारी लावून धरल्याने सन २०१५ मध्ये १९९१ ते २०२१ या तीस वर्षांच्या कालावधीसाठी लीजच्या नूतनीकरणास नगर विकास विभागाने मान्यता दिली होती. तर आता समस्या निकाली निघाल्याने रामनगरवासीयांना दिलासाच मिळणार आहे.

सत्ता परिवर्तन होताच पुन्हा केला पाठपुरावा-    शासन निर्णयानुसार नागरिकांच्या लीजचे नगर परिषदेने २०२१ पर्यंत नूतनीकरण करून दिले; परंतु लीजचा कालावधी सन २०२१ मध्ये संपल्याने पुन्हा नूतनीकरण करण्यासंदर्भात आ. भोयर यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, शासनपातळीवर याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. राज्यात सत्ता परिर्वतन झाल्यानंतर आ. डॉ. पंकज भोयर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भेट घेऊन लीजचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.-    आ. डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या समारोपीय कार्यक्रमात रविवार २ ऑक्टोबरला आ. पंकज भोयर यांनी रामनगर लीजचा प्रश्न सोडविण्याची मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. -   ना. फडणवीस यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन शासन आदेश काढण्यात येईल, अशी घोषणा केली. अवघ्या दोन दिवसांतच वर्धेकरांना दिलेल्या आश्वासनावर विचार होत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी ४ ऑक्टोबरला लीजच्या नूतनीकरणासंदर्भात शासन आदेश काढला आहे. या आदेशामुळे रामनगर येथील लीजधारकांच्या लीजचे २०५१ पर्यंत नूतनीकरण करण्यात आले आहे.

रामनगर लीजचा प्रश्न तातडीने सोडविला जाईल, असे आश्वासन आ. डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता  सेवा पंधरवड्याच्या समारोपीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यावर वर्धेकरांना दिलेले आश्वासन अवघ्या काही तासांतच पाळून समस्या निकाली काढलीआहे. त्यामुळे रामनगरवासीयांच्या वतीने आपण त्यांचे आभारच मानतो.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.

१९६१ ते १९९१ पर्यंत झाले होते पुन: लीजचे नूतनीकरण

-    वर्धा नपच्या कार्यक्षेत्रातील जुना मौजा सिंदी (मेघे)मधील शेत सर्व्हे क्रमांक १०४, ११०, ११४ मध्ये ७०७ भूखंड पाडून १९३१ ते १९६१ या कालावधीसाठी लीजवर दिले. कालांतराने या परिसराला रामनगर म्हणून ओळखल्या जाऊ लागले. सन १९६१ ते १९९१ पर्यंत पुन: लीजचे नूतनीकरण करण्यात आले आले.असे असले तरी यानंतर लीजचे नूतनीकरण करण्यात न आल्याने येथील रहिवाशांसमोर मोठा प्रश्नउभा झाला तर आता समस्या निकाली निघाली आहे.

 

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर