शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष-उपाध्यक्षाचा वाद चव्हाट्यावर

By admin | Updated: June 13, 2016 00:30 IST

नगर परिषदेच्या उपाध्यक्षाला सध्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत. यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षात उडणारे खटके नित्याचेच झाले आहे.

वर्धा पालिकेत गोंधळ : पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांच्या पुढ्यात कचऱ्याचे ढिगारेवर्धा : नगर परिषदेच्या उपाध्यक्षाला सध्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत. यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षात उडणारे खटके नित्याचेच झाले आहे. परिणामी वर्धा पालिकेची ओळख रोजभांड पालिका अशी होत आहे. या दोघांत होत असलेली भांडणे आता चव्हाट्यावर येवू लागल्याने शहराच्या विकासाला खिळ बसली आहे.पालिकेवर काँग्रेसची सत्ता असताना नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. यावेळी पालिकेत सत्ता स्थापन करताना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गठबंधन झाले. यातून राष्ट्रवादी काँग्रसेला अध्यक्ष व भाजपला उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला होता. आता मात्र अचानक उपाध्यक्षांना अध्यक्षपदाचे डोहाळे लागले. यामुळे हे गठबंधन धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. पालिकेच्यावतीने नाल्यांतील कचरा काढण्याचे कार्य सुरू आहे; मात्र त्यात सातत्य नसल्याने शहरातील अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. तर काही ठिकाणी काढण्यात आलेला कचरा रस्त्याच्या कडेला नागरिकांच्या घरासमोर साचला आहे. याचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. रोजच आकाशात आभाळ दाटत असल्याने कोणत्याही क्षणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेकांच्या घरासमोर असलेल्या कचऱ्यामुळे रोगराईमुळे पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याची माहिती अनेकांनी पालिकेला दिली; मात्र अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या भांडणात याकडे कोणीही लक्ष देण्याकरिता कोणीही तयार नाही. या दोघांच्या भांडणात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही अनेक कामाच्या फाईल्स अडवून ठेवल्याचा आरोप नगरसेवक जगदीश टावरी यांनी केला आहे. यामुळे वर्धा पालिकेत नेमके सुरू तरी काय आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. वर्धा पालिकेत सध्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांत वाद सुरू आहे. या वादामुळे शहरातील अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शहराच्या विकासाकरिता आलेला निधी तसाच खितपत पडून आहे. पालिकेत सुरू असलेल्या कमिशनखोरीच्या वादामुळे विकास खोळंबला आहे.- जगदीश टावरी, नगरसेवक प्रभाग क्र.७, वर्धा