शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:45 IST

१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : स्प्रिंकलरने पाणी देणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कापसाचे जुनेच बियाणे असल्याने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कापसावर बोंडअळी येणार या भितीने परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला. यावर्षी पेरणी साधली. सोयाबीनची वाढ चांगली झाली. सुरुवातीपासून खंडीत स्वरूपाचा पाऊस येत गेल्याने आंतर मशागतीला वेळ मिळाला. परिणामी यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होणार अशी आशा शेतकºयाना होती. त्यामुळे हे वर्ष सोयाबीनचे वर्ष आहे, अशी चर्चा शेतकºयांमधून ऐकायला मिळत असतानाच ऐन फुलोर येण्याच्या अवस्थेत हे पीक मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अडचणीत आले आहे. नक्षत्र बदलल्यावर पाऊस येईल, अशी शेतकºयांना आशा होती. पण ३-४ आॅगस्ट उलटून गेला, तरी पावसाचे चिन्ह नाही. हवामानाचा अंदाज संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा जाणार असे सांगत आहे. हा अंदाज खरा ठरला तर कोरडवाहू सोयाबीन हे पीक पुर्णत: नष्ट होण्याच्या स्थितीत राहिल. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सोयाबीन हे पीक अल्पावधीचे पीक असून ४५ दिवसात ते फुलावर येते व ९० ते ९५ दिवसात कापणीला येते. या पीकाला शेवटपर्यंत सातत्यपूर्ण पावसाची गरज असते. पण यंदा पावसाचे अत्यल्प व त्यातही मोठा खंड यामुळे हे वर्ष अवर्षणाचे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत कापूस बोंडअळीने व सोयाबीन पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची झोप मात्र उडविली आहे. पाऊस न आल्यास सोयाबीनला सर्वाधिक धोका आहे.पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडचिकणी (जा.) शिवारात भर पावसाळ्याच्या दिवसात सोयाबीन पिकाला सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हल्ली सोयाबीन पीक फुलांवर आली असून १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे फुलावर आलेले सोयाबीन पीक वाचविण्याकरिता शेतकरी धडपड करीत आहे. हीच परिस्थिती कोरडवाहू भागातील शेतकºयांची आहे. त्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात भारनियमनाच्या वेळा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे शेतकºयांना कधीकधी रात्रीच्या वेळीही सोयाबीन पीकाला ओलीत करावे लागत आहे. यासाठी रात्रपाळीचा मजूरही कामावर ठेवावा लागत आहे.