शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:45 IST

१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : स्प्रिंकलरने पाणी देणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कापसाचे जुनेच बियाणे असल्याने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कापसावर बोंडअळी येणार या भितीने परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला. यावर्षी पेरणी साधली. सोयाबीनची वाढ चांगली झाली. सुरुवातीपासून खंडीत स्वरूपाचा पाऊस येत गेल्याने आंतर मशागतीला वेळ मिळाला. परिणामी यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होणार अशी आशा शेतकºयाना होती. त्यामुळे हे वर्ष सोयाबीनचे वर्ष आहे, अशी चर्चा शेतकºयांमधून ऐकायला मिळत असतानाच ऐन फुलोर येण्याच्या अवस्थेत हे पीक मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अडचणीत आले आहे. नक्षत्र बदलल्यावर पाऊस येईल, अशी शेतकºयांना आशा होती. पण ३-४ आॅगस्ट उलटून गेला, तरी पावसाचे चिन्ह नाही. हवामानाचा अंदाज संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा जाणार असे सांगत आहे. हा अंदाज खरा ठरला तर कोरडवाहू सोयाबीन हे पीक पुर्णत: नष्ट होण्याच्या स्थितीत राहिल. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सोयाबीन हे पीक अल्पावधीचे पीक असून ४५ दिवसात ते फुलावर येते व ९० ते ९५ दिवसात कापणीला येते. या पीकाला शेवटपर्यंत सातत्यपूर्ण पावसाची गरज असते. पण यंदा पावसाचे अत्यल्प व त्यातही मोठा खंड यामुळे हे वर्ष अवर्षणाचे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत कापूस बोंडअळीने व सोयाबीन पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची झोप मात्र उडविली आहे. पाऊस न आल्यास सोयाबीनला सर्वाधिक धोका आहे.पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडचिकणी (जा.) शिवारात भर पावसाळ्याच्या दिवसात सोयाबीन पिकाला सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हल्ली सोयाबीन पीक फुलांवर आली असून १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे फुलावर आलेले सोयाबीन पीक वाचविण्याकरिता शेतकरी धडपड करीत आहे. हीच परिस्थिती कोरडवाहू भागातील शेतकºयांची आहे. त्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात भारनियमनाच्या वेळा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे शेतकºयांना कधीकधी रात्रीच्या वेळीही सोयाबीन पीकाला ओलीत करावे लागत आहे. यासाठी रात्रपाळीचा मजूरही कामावर ठेवावा लागत आहे.