शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:45 IST

१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : स्प्रिंकलरने पाणी देणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कापसाचे जुनेच बियाणे असल्याने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कापसावर बोंडअळी येणार या भितीने परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला. यावर्षी पेरणी साधली. सोयाबीनची वाढ चांगली झाली. सुरुवातीपासून खंडीत स्वरूपाचा पाऊस येत गेल्याने आंतर मशागतीला वेळ मिळाला. परिणामी यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होणार अशी आशा शेतकºयाना होती. त्यामुळे हे वर्ष सोयाबीनचे वर्ष आहे, अशी चर्चा शेतकºयांमधून ऐकायला मिळत असतानाच ऐन फुलोर येण्याच्या अवस्थेत हे पीक मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अडचणीत आले आहे. नक्षत्र बदलल्यावर पाऊस येईल, अशी शेतकºयांना आशा होती. पण ३-४ आॅगस्ट उलटून गेला, तरी पावसाचे चिन्ह नाही. हवामानाचा अंदाज संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा जाणार असे सांगत आहे. हा अंदाज खरा ठरला तर कोरडवाहू सोयाबीन हे पीक पुर्णत: नष्ट होण्याच्या स्थितीत राहिल. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सोयाबीन हे पीक अल्पावधीचे पीक असून ४५ दिवसात ते फुलावर येते व ९० ते ९५ दिवसात कापणीला येते. या पीकाला शेवटपर्यंत सातत्यपूर्ण पावसाची गरज असते. पण यंदा पावसाचे अत्यल्प व त्यातही मोठा खंड यामुळे हे वर्ष अवर्षणाचे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत कापूस बोंडअळीने व सोयाबीन पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची झोप मात्र उडविली आहे. पाऊस न आल्यास सोयाबीनला सर्वाधिक धोका आहे.पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडचिकणी (जा.) शिवारात भर पावसाळ्याच्या दिवसात सोयाबीन पिकाला सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हल्ली सोयाबीन पीक फुलांवर आली असून १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे फुलावर आलेले सोयाबीन पीक वाचविण्याकरिता शेतकरी धडपड करीत आहे. हीच परिस्थिती कोरडवाहू भागातील शेतकºयांची आहे. त्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात भारनियमनाच्या वेळा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे शेतकºयांना कधीकधी रात्रीच्या वेळीही सोयाबीन पीकाला ओलीत करावे लागत आहे. यासाठी रात्रपाळीचा मजूरही कामावर ठेवावा लागत आहे.