शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनने मोडले कंबरडे, कपाशीवर भिस्त

By admin | Updated: November 9, 2014 23:18 IST

सोयाबीनने कंबरडे मोडले़ भिस्त आता कपासीवर आहे. पण एक दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची स्थिती असल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे़

सेवाग्राम : सोयाबीनने कंबरडे मोडले़ भिस्त आता कपासीवर आहे. पण एक दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची स्थिती असल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे़ येणारा हंगाम शेतकऱ्यांच्या हिताचा असावा अशी अपेक्षा शेतकरी व्हक्त करीत आहे. सातत्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक, दिशाभूल होत आली आहे़ त्याच अवस्थेत नव्हे तर त्यांचे खच्चीकरण कसे करता येईल हेच धोरण शासनाने राबविले आहे़ सध्यातरी शेतकरी सोयाबीन सवंगणी व काढण्याच्या कामात व्यस्त असून सामान्यपाणे एकरी एक ते तीन पोते असा सर्वत्र उतारा आहे़ ठराविकच शेतकऱ्यांना चार ते पाच पोत्यांचा उतारा आहे़ मात्र दाना बारिक असल्याने किती भाव मिळणार असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.दिवाळी अगोदर निघणारे सोयाबीन यावेळी पावसामुळे दिवाळीनंतर काढण्यात येत आहे़ सेवाग्राम ते हमदापूर तसेच आलगाव, बोंडसुला आदी गावात सोयाबीनचे उत्पन्न पाच टक्के असल्याने सोयाबीन उत्पादक पूर्णत: बुडाला आहे़ याच गावातील काही शेतकऱ्यांनी न सवंगण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली़ सोयाबीन सारखीच कपाशीची अवस्था आहे़ कोरडवाहूमध्ये अडीच ते तीन क्विंटल आणि ओलिताचा पाच ते सहा क्विंटल असे एकरी उत्पादन राहणार आहे़ पण लाल्याचा प्रकोप आल्याने यावर सुद्धा संक्रात आली आहे़ पऱ्हाटीला थंडी व पाण्याची गरज आहे़ दोन्ही प्रमाण कमी असल्याने रोग वाढत आहे. यामुळे फारच कमी वेचे होणार असे दिसत आहे. निसर्गाच्या भरोश्यावर आणि आशेवर जगणारा शेतकरी चना वा गव्हाची पेरणी करून काही पदरात पाडण्याची तयारी करीत आहे़ कर्ज व उसनवारी फेडायची की जगायचे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे़ शेतकऱ्यांना होणारे उत्पन्न पाहता बँकेचे लोन सुद्धा यावर्षी फेडू शकणार नाही, अशा परिस्थितीत शेतकरी आहे़ महागाई वाढत आहे़ मजुरीपासून तर बियाणे आणि शेतमाल काढण्यापर्यंत हिशोब भोवळ आणणारा असाच आहे़ ग्रामीण क्षेत्र व जीवन शेतीवर असल्याने चिंताजनक वातावरण दिसत आहे़(वार्ताहर)