शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

१०.११ टक्के पावसाच्या जोरावर झाली तब्बल १.१० लाख हेक्टरवर पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 5:00 AM

एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. एकूणच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच मोठा धाडस करून विविध पिकांची पेरणी केल्याची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला असला तरी याच पावसाच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल १.१० लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. अंकुरलेले पीक जगविण्यासाठी सध्या शेतकरी तारेवरची कसरत करीत असून दमदार पाऊस येईल, अशी आशा करीत जिल्ह्यातील शेतकरी चातकाप्रमाणेच पावसाची प्रतीक्षा करीत आहे.मागील वर्षी २९ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२८.८८ मिमी पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात केवळ सरासरी ८४.२९ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. एकूणच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच मोठा धाडस करून विविध पिकांची पेरणी केल्याची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

१६ जुलैपर्यंत करता येते कपाशी, सोयाबीनची लागवड-  मृग पूर्ण तर निम्मे आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे मोठा धोका पत्कारून सध्या शेतकरीही पेरणीच्या कामांना गती देत आहेत. -  पण १६ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची लागवड करता येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात १.१० लाख हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड झाली आहे. शेत शिवारात पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे करावे. १६ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची लागवड करता येते.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती