शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By admin | Updated: December 16, 2014 22:57 IST

जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सदर पथक विजयगोपाल येथे दाखल झाले.

चार गावांना भेट : शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतीची पाहणी; अधिकाऱ्यांचीही हजेरीवर्धा : जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सदर पथक विजयगोपाल येथे दाखल झाले. येथील माहिती घेतल्यानंतर सदर पथक इंझाळा, कवठा व वर्धा तालुक्यातील कुरझडी या गावातील माहिती घेतली. पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व जलनिसारण विभागाचे सहायक सल्लागार विजयकुमार बादला, पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक चंद्रशेखर साहुरकर, कापूस अनुसंधान विभागाचे संचालक आर.पी. सिंग, राज्य शासनाचे उपसचिव मंदरा पोहरे व अवर सचिव श्रीनंद घोलप यांची उपस्थिती होती.विजयगोपाल येथे या पथकाच्या सदस्यांनी शेतीची पाहणी केली. विजयगोपाल येथील पैसेवारी ४८ च्या आत असल्याने केंद्रातून आलेल्या पथकाने किशोर मारोती झोरे यांच्या शेतात जाऊन त्या शेतीची पाहणी केली. यावेळी पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. झोरे यांना उत्पन्नासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तीन एकर शेतात २० किलो कापूस झाल्याचे सांगितले. याकरिता ५० हजार रुपये खर्च झाल्याचे सांगताच पथकातील अधिकारी अवाक् झाले. एवढा खर्च झाल्याने आता जगावे कसे, सावकाराचे व बँकेचे कर्ज, कृषी केंद्राचे कर्ज कसे द्यायचे, असा प्रश्न या शेतकऱ्याने पथकातील अधिकाऱ्यांना विचारताच ते निरूत्तर झाले. शेतकरी बाळाजी केशव म्हसे यांच्याशी पथकाने संवाद साधला असता त्यांनी १२ एकर शेतीत १२ किलो कापूस घरी आलेला नाही. राहायला मालकीचे घर नाही. सावकरी व बँकेचे कर्ज डोक्यावर असल्याच्या व्यथा मांडल्या. विजयगोपाल येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याकरिता केंद्रीय पथकाच्या स्वाधीन केले. यावेळी सरपंच निलम बिन्नोड यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा पथकासमोर मांडल्या. यावेळी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयगोपाल येथील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर पथक त्यांच्या कार्यक्रमात असलेल्या इंझाळा या गावाकडे रवाना झाले. इंझाळा येथील शेतकरी बाबाराव सरडे यांची भेट घेत शेतीची पाहणी केली. या गावातून अवघ्या तीन मिनिटात पथक कवठा येथील मधुकर राऊत यांच्या शेताची पाहणी करून वर्धा तालुक्यातल कुरझडी येथे आले. तेथून ते वर्धेत दाखल झाले. यावेळी वर्धेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)