१,६०० क्विंटल चणा, तूर, सोयाबीन भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:20+5:30

लॉकडॉऊनच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल खरेदीला सुरूवात केली. पांडुरंग बाभूळकर, गणेश गुप्ता व पिंटू बादले या व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केली. खरेदी केलेला चणा, तूर व सोयाबीन हा शेतमाल पोत्यात भरून बाजार समितीच्या यार्डवर उघड्यावर ठेवण्यात आला होता. हाच शेतमाल रविवारी पहाटे झालेल्या पावसादरम्यान भिजला.

Soaked beans, turkey, soybeans, 1.5 quintals | १,६०० क्विंटल चणा, तूर, सोयाबीन भिजले

१,६०० क्विंटल चणा, तूर, सोयाबीन भिजले

ठळक मुद्देअवकाळीचा फटका : व्यापाऱ्यांचे ७० लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : मध्यरात्री झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे स्थानिक बाजार समितीतील १ हजार ६०० क्विंटल चणा, तूर, सोयाबीन भिजले. यामुळे व्यापाऱ्यांचे ७० हजारांचे नुकसान झाले आहे.
लॉकडॉऊनच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल खरेदीला सुरूवात केली. पांडुरंग बाभूळकर, गणेश गुप्ता व पिंटू बादले या व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केली. खरेदी केलेला चणा, तूर व सोयाबीन हा शेतमाल पोत्यात भरून बाजार समितीच्या यार्डवर उघड्यावर ठेवण्यात आला होता. हाच शेतमाल रविवारी पहाटे झालेल्या पावसादरम्यान भिजला. भिजलेल्या शेतमालामध्ये पांडुरंग बाभुळकर यांचा ९०० क्विंटल चणा, १५० क्विटल सोयाबिन असून त्यांचे ४२ लाखांचे नुकसान झाले आहे. गणेश गुप्ता यांच्या मालकीचा ३५ क्विंटल चणा, ७० क्विंटल तुरी भिजल्या असून त्यांचे साडे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. तर पिंटु बादले यांच्या मालकीचा ५०० क्विंटल चणा, तुर, सोयाबिन भिजल्याने त्यांचे २० लाखांचे नुकसान झाले आहे. अचानक ओढावलेल्या या संकटामुळे या व्यापाºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

Web Title: Soaked beans, turkey, soybeans, 1.5 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.