शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
4
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
5
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
6
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
7
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
8
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
9
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
10
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
11
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
13
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
14
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
15
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
16
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
17
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
18
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
19
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात बिकट परिस्थिती ; शेतपिके वाहून गेली, घरं ढासळली : पालकमंत्र्यांनी दिला मदतीचा शब्द !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:01 IST

अधिकाऱ्यांना दिले निर्देश : पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू व वर्धा तालुक्यातील काही भागात दिनांक १८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त सेलू तालुक्यातील मदनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी साचून झालेल्या नुकसानीची तसेच वर्धा तालुक्यातील आंजी येथील गावात नदीला पूर आल्यामुळे गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाहणी केली.

ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांनी एकत्रितरित्या पंचनामे करून तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मदनी येथील गौरव गावंडे या शेतकऱ्याच्या शेतपिकाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याची मागणी केली. राज्य शासनाने बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. या योजनेमधून रस्ता लवकरच मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मदनी परिसरातील ३१ हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मदनी येथील पाहणीदरम्यान सेलूचे तहसीलदार मलीक विराणी, नायब तहसीलदार किरसान, सहायक गटविकास अधिकारी चोपडे, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व गावकरी उपस्थित होते. 

पंचधारा प्रकल्पाला भेटनुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पंचधारा प्रकल्पाला क वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा पर्यटन स्थळाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भेट दिली. निसर्गसौंदर्य असलेल्या पंचधारा पर्यटन स्थळावर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्यामुळे पर्यटनाच्या चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, रिधोराच्या सरपंच साक्षी भगत होते.

तत्काळ घरकुल मंजूर कराआंजी येथील धाम नदीला पूर आल्याने नदीकाठावरील घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करताना डॉ. पंकज भोयर यांनी नुकसानग्रस्त घरमालकांना तत्काळ घरकुल मंजूर करण्याच्या सूचना देऊन जलसंपदा विभागाने धाम नदी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत नदीच्या संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर नदीच्या खोलीकरणाचे व गाळ काढण्याचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री भोयर यांनी केल्या. यावेळी तहसीलदार संदीप पुंडेकर, संदीप दाबेराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे, सुनील गफाट, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देत तत्काळ घरकुल मंजूर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :wardha-acवर्धाPankaj Bhoyarपंकज भोयरFarmerशेतकरी