शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

वर्धा जिल्ह्यात बिकट परिस्थिती ; शेतपिके वाहून गेली, घरं ढासळली : पालकमंत्र्यांनी दिला मदतीचा शब्द !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:01 IST

अधिकाऱ्यांना दिले निर्देश : पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू व वर्धा तालुक्यातील काही भागात दिनांक १८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त सेलू तालुक्यातील मदनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी साचून झालेल्या नुकसानीची तसेच वर्धा तालुक्यातील आंजी येथील गावात नदीला पूर आल्यामुळे गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाहणी केली.

ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांनी एकत्रितरित्या पंचनामे करून तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मदनी येथील गौरव गावंडे या शेतकऱ्याच्या शेतपिकाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याची मागणी केली. राज्य शासनाने बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. या योजनेमधून रस्ता लवकरच मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मदनी परिसरातील ३१ हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मदनी येथील पाहणीदरम्यान सेलूचे तहसीलदार मलीक विराणी, नायब तहसीलदार किरसान, सहायक गटविकास अधिकारी चोपडे, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व गावकरी उपस्थित होते. 

पंचधारा प्रकल्पाला भेटनुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पंचधारा प्रकल्पाला क वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा पर्यटन स्थळाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भेट दिली. निसर्गसौंदर्य असलेल्या पंचधारा पर्यटन स्थळावर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्यामुळे पर्यटनाच्या चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, रिधोराच्या सरपंच साक्षी भगत होते.

तत्काळ घरकुल मंजूर कराआंजी येथील धाम नदीला पूर आल्याने नदीकाठावरील घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करताना डॉ. पंकज भोयर यांनी नुकसानग्रस्त घरमालकांना तत्काळ घरकुल मंजूर करण्याच्या सूचना देऊन जलसंपदा विभागाने धाम नदी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत नदीच्या संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर नदीच्या खोलीकरणाचे व गाळ काढण्याचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री भोयर यांनी केल्या. यावेळी तहसीलदार संदीप पुंडेकर, संदीप दाबेराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे, सुनील गफाट, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देत तत्काळ घरकुल मंजूर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :wardha-acवर्धाPankaj Bhoyarपंकज भोयरFarmerशेतकरी