शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात बिकट परिस्थिती ; शेतपिके वाहून गेली, घरं ढासळली : पालकमंत्र्यांनी दिला मदतीचा शब्द !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:01 IST

अधिकाऱ्यांना दिले निर्देश : पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू व वर्धा तालुक्यातील काही भागात दिनांक १८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त सेलू तालुक्यातील मदनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी साचून झालेल्या नुकसानीची तसेच वर्धा तालुक्यातील आंजी येथील गावात नदीला पूर आल्यामुळे गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाहणी केली.

ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांनी एकत्रितरित्या पंचनामे करून तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मदनी येथील गौरव गावंडे या शेतकऱ्याच्या शेतपिकाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याची मागणी केली. राज्य शासनाने बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. या योजनेमधून रस्ता लवकरच मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मदनी परिसरातील ३१ हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मदनी येथील पाहणीदरम्यान सेलूचे तहसीलदार मलीक विराणी, नायब तहसीलदार किरसान, सहायक गटविकास अधिकारी चोपडे, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व गावकरी उपस्थित होते. 

पंचधारा प्रकल्पाला भेटनुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पंचधारा प्रकल्पाला क वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा पर्यटन स्थळाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भेट दिली. निसर्गसौंदर्य असलेल्या पंचधारा पर्यटन स्थळावर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्यामुळे पर्यटनाच्या चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, रिधोराच्या सरपंच साक्षी भगत होते.

तत्काळ घरकुल मंजूर कराआंजी येथील धाम नदीला पूर आल्याने नदीकाठावरील घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करताना डॉ. पंकज भोयर यांनी नुकसानग्रस्त घरमालकांना तत्काळ घरकुल मंजूर करण्याच्या सूचना देऊन जलसंपदा विभागाने धाम नदी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत नदीच्या संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर नदीच्या खोलीकरणाचे व गाळ काढण्याचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री भोयर यांनी केल्या. यावेळी तहसीलदार संदीप पुंडेकर, संदीप दाबेराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे, सुनील गफाट, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देत तत्काळ घरकुल मंजूर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :wardha-acवर्धाPankaj Bhoyarपंकज भोयरFarmerशेतकरी