जिल्ह्यात १४५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:11+5:30

उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला आहे.

Shortage of water in 145 villages in the district | जिल्ह्यात १४५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

जिल्ह्यात १४५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

googlenewsNext
ठळक मुद्दे२ कोटी ६९ लाख ७८ हजारांचा खर्च अपेक्षित

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येत्या उन्हाळ्यात जानेवारी २०२० ते मार्च पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यांतील आरखड्यानुसार पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यासाठी १०४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना संभाव्य टंचाईग्रस्त १४५ गावांसाठी प्रस्तावित करण्यात आल्या असून एकूण २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला आहे. आराखड्यानुसार १४५ गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईची स्थिती उद्भवू शकते. त्यासाठी जिल्ह्यात १०४ उपाययोजना सुद्धा पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या आहेत.
संबंधीत कामे हिवाळ्यात सुरू करून नागरिकांना उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी संबंधित उपाययोजनांना जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच मंजुरी देणे अपेक्षित आहे. ग्रामीण पुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात उपाययोजना मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर त्याला मंजुरी मिळण्यास विलंब होते. परिणामी, उन्हाळा संपल्यानंतर उपाय योजनांची कामे सुरू होतात. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणी टंचाई उपाय योजनांच्या गावाची यादीसह कृषी आराखडा शासनाला पाठविला आहे. त्यात जानेवारी ते मार्च २०२० या ३ महिन्यातील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी एकूण प्रस्तावित १४५ गावांसाठी एकूण १०४ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. या उपाययोजनांना २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये आर्वी तालुक्यातील २८ गावांसाठी ४८ उपायोजना, आष्टी तालुक्यातील २३ गावांसाठी ३०, कारंजा तालुक्यातील ४९ गावांसाठी ६९, सेलू तालुक्यातील २ गावांकरिता ४, हिंगणघाट तालुक्यातील १० गावांसाठी १२, समुद्रपूर तालुक्यातील ३३ गावांसाठी ३५ उपयायोजनांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

अधिग्रहित विहिरींचा समावेश
आर्वी तालुक्यातील २८ ठिकाणी २० विहिरी, आष्टी तालुक्यातील २३ ठिकाणी १२, कारंजातील ४९ ठिकाणी २७, सेलू २ ठिकणी २, हिंगणघाट तालुक्यातील १० ठिकाणी ५, समुद्रपूर तालुक्यातील ३३ ठिकाणी २ खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे अपेक्षीत आहे.

Web Title: Shortage of water in 145 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.