शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

सेवाग्राम विकास आराखड्यालाही आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 9:40 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ आॅक्टोबर २०१९ ला साजरी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने सेवाग्राम, पवनार विकास आराखडा तयार करून याअंतर्गत विकास कामे गांधी जयंतीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देपवनारातील कामे रखडणार : २ आॅक्टोबरपूर्वी कामे होण्याची शक्यता कमी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ आॅक्टोबर २०१९ ला साजरी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने सेवाग्राम, पवनार विकास आराखडा तयार करून याअंतर्गत विकास कामे गांधी जयंतीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, ग्रामपंचायत, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताच मे महिन्यापर्यंत राहणार आहे. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सेवाग्राम व पवनार विकास आराखड्यातील कामे रखडण्याची चिन्हे आहेत.विद्यमान राज्य सरकारने महात्मा गांधींची कर्मभूमी सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे यांची पावनभूमी पवनारसह परिसरातील गावांच्या विकासाच्या दृष्टीने सेवाग्राम विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातून पवनार व सेवाग्राम भागात अनेक विकास कामे केली जात आहेत. पवनारात २६ कोटी रुपये घाट विकास कार्यक्रमासाठी, ६ कोटी ९ लाख रुपये अंतर्गत विकासासाठी देण्यात येणार आहेत. याशिवाय धाम नदीवरील बंधाऱ्याच्या वरच्या भागात २ कोटी ६४ लाख रुपयांतून फॉरेस्ट पार्क तयार करण्यात येणार आहे.विद्यमान स्थितीत धामनदीच्या भागात घाटाचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच नंदीघाट व आश्रम भागाला लागून असलेल्या भागात दर्शनी गेट व काही इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, फॉरेस्ट पार्कची निविदा काढण्यात आली असली तरी वर्क आॅर्डर अजूनही देण्यात आलेला नाही. आचारसंहिता असल्याने वर्क आॅर्डरचे काम रखडले आहे. तसेच अंतर्गत विकास कामांचाही कार्यारंभ आदेश रखडलेला आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही आचारसंहितेमुळे या विकासकामांवर परिणाम झाला आहे. २ आॅक्टोबरच्या १५० व्या गांधी जयंती पूर्वी हे काम मार्गी लागणे कठीण आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थानांतरणामुळे बराच परिणामसेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मोठा वेग दिला होता. मात्र, नवाल यांची येथून बदली झाली. नव्याने आलेल्या जिल्हाधिकाºयांनी सदर आराखड्याच्या कामाबद्दल आढावा बैठक घेतली नसल्याचे बोलले जाते. ते आराखड्याच्या कामाकडे दुर्लक्ष करून आहेत. अधिकारी बदलल्याने या आराखड्याच्या विविध कामांकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम सेवाग्राम व पवनार या दोन्ही गावाच्या विकासावर होणार आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामMahatma Gandhiमहात्मा गांधी