शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा असुविधांच्या गर्तेत

By admin | Updated: September 3, 2016 00:15 IST

शाळा स्तरीय विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. देशाकरिता खेळाडू निर्माण व्हावे व ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणांना चालना मिळावी,

मैदानात गवत व मोठमोठे खड्डे : लक्ष विचलित होताच अपघाताचा धोकावर्धा : शाळा स्तरीय विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. देशाकरिता खेळाडू निर्माण व्हावे व ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणांना चालना मिळावी, याकरिता या स्पर्धा आयोजित असल्याचे बोलले जाते; मात्र या खेळाडुंना सुविधा पुरविण्यात शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. असाच काहीसा प्रकार तालुकास्तरीय व्हॉलीस्पर्धेत दिसून आला आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव, साहित्याची कमतरता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे. वर्धा तालुक्याच्या शालेय स्तरावरील विविध व्हॉलीबॉल स्पर्धा क्रीडा संकुलातील मैदानावर घेण्यात आल्या. या मैदानाच्या बाजूचे गवतही व्यवस्थित काढण्यात आले नव्हते. स्पर्धेकरिता म्हणून वेळेवर तयार केलेले मैदान होते. यावरच शालेय गटातील स्पर्धा पार पडल्या. याशिवाय या मैदानाच्या बाजूला असलेले खोल खड्डेही खेळाडूंकरिता धोकादायक होते. अशा स्थितीत खेळाडूंनी येथे उत्कृष्ट कामगिरी करावी अशी अपेक्षा असते; मात्र खेळाडूंना द्यावयाच्या प्राथमिक स्तरावरील सुविधा पुरविण्यास टाळाटाळ होतो. हाच प्रकार या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आला. या सर्व असुविधांच्या परिणाम थेट खेळाडूंच्या कामगिरीवर होतो, याचा विसर कदाचित शासनाला पडला असावा. (शहर प्रतिनिधी)मैदानावरील गवतामुळे खेळाडू पडण्याची भीतीविद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा या एका दिवसाच्या निर्णयातून झालेल्या नसाव्या, असे येथे येणाऱ्या प्रेक्षकांना वाटने सहज आहे. या स्पर्धेची कल्पना असताना त्याकरिता योग्य मैदान तयार करण्याची जबाबदारी आयोजकांनी होती; मात्र वर्धेत असे झाले नाही. विद्यार्थ्यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानाचा वापर करण्यात आला. या मैदानावर आजुबाजूला मोठ्या प्रमाणात गवत असल्याचे दिसून आले आहे. या गवतामुळे खेळताना विद्यार्थी घसरून पडण्याची शक्यता होती. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे येथे कुठलीही घटना घडली नाही. मैदनाच्या या तयारीमुळे विद्यार्थ्यांच्या स्पर्धांबाबत क्रीडा विभाग किती सजग आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. मैदानावर केवळ गवतच नाही तर येथे टाकण्यात आलेल्या मातीत बारीक गोटे असल्याने विद्यार्थ्यांच्या पायाला इजा झाल्याचे दिसून आले आहे. हे खेळाडू ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यातील गुणांना कमी लेखण्याचा प्रयत्न येथे झाल्याचा आरोप काही जणांकडून करण्यात आला आहे. असे असेल क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी अशी व्यवस्था करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज वर्तविली जात आहे. मैदानाशेजारीच खोल खड्डेव्हॉलीबॉलच्या स्पर्धा झाल्या त्या मैदनालगत मोठ मोठे खड्डे असल्याचे दिसून आले. खोदण्यात आलेले खड्डे मैदानाचा विस्तार करण्याकरिता असल्याचे सांगण्यात आले; मात्र हे खड्डे खोदून बराच काळ झाल्याचे त्याकडे पाहून वाटत आहे. खोदलेल्या खड्ड्यात झाडे उगविली असून ती मैदानाच्या शेजारीच आहेत. येथे खेळताना जर एखाद्या खेळाडुचे याकडे दुर्लक्ष झाले तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पर्धेदरम्यान तसे झाले नाही. या मैदानावर असे मोठे खड्डे असताना आयोजकांनी या मैदानाची निवड करून खेळाडुंचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार केला आहे. यामागचे कारण काय, याचा विचार करणे गरजेजे झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.