शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

बहुजनांच्या शोषणासाठीच संस्कृतचा अट्टाहास

By admin | Updated: December 13, 2014 22:45 IST

बहुजनांच्या डोक्यावर सांस्कृतिक अधिपत्य लादण्यासाठीच हिंदू या शब्दाच वापर करणाऱ्या शक्ती बहुजनांना स्वत:ची संस्कृती, भाषा व जीवनच विसरायला भाग पाडत आहे. ज्या भाषेशिवाय आपण

तिसरे लोकभाषा संमेलन : बी. जी. कोळसे पाटील यांचे प्रतिपादनवर्धा : बहुजनांच्या डोक्यावर सांस्कृतिक अधिपत्य लादण्यासाठीच हिंदू या शब्दाच वापर करणाऱ्या शक्ती बहुजनांना स्वत:ची संस्कृती, भाषा व जीवनच विसरायला भाग पाडत आहे. ज्या भाषेशिवाय आपण व्यक्त होऊ शकत नाही त्या भाषिक पातळीवरही बहुजनांचे शोषण सुरू असून संस्कृतचा अट्टाहास हा त्याचाच भाग आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी केले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात तिसरे लोकभाषा संमेलन १३ आणि १४ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर स्वागताध्यक्ष दिनेश सवाई, डॉ. चेतना सवाई, उद्घाटन सत्राचे अध्यक्ष नागेश चौधरी, भाषा अभ्यासक अरूण जाखडे पुणे, कृषी कीर्तनकार महादेव भुईभार, लोकसाहित्यिक डॉ. मधुकर वाकोडे, बबन नाखले, जगन वंजारी, अरविंद देशमुख व संयोजक प्रा. नूतन माळवी उपस्थित होते.न्या. कोळसे पाटील म्हणाले, फुले, आंबेडकरांनी बहुजनांना शिक्षित करण्याचा वसा उचलला. त्यातून शिक्षित झालेल्यांनी संविधानाची प्रस्तावना हातात घेवून शोषण मुक्त समाज निर्मितीसाठी लढले पाहिजे.ज्ञानेश्वर, तुकारामांच्या काळापर्यंत सोपी असलेली मराठी ही मोरोपंतानी बिघडविली असे सांगत मधुकर वाकोडे म्हणाले, भाषा मेली की माणसे मरतात. आज चित्पावनांची भाषा ही प्रमाण भाषा बनल्यामुळे बहुजनांमध्ये सांस्कृतिक न्यूनगंड वाढून त्यांचा बौद्धीक विकास खुंटला आहे. आपल्या देशाव्यापी भाषिक सर्व्हेक्षणाचा अनुभव कथन करताना पद्मगंधाा प्रकाशनचे अरूण जाखडे म्हणाले, आपल्या देशात भाषिक वेदना प्रचंड आहेत. भाषा वाचविण्याचे काम हे केवळ भाषाशास्त्राचे नसून ते संपूर्ण समाजाचे आहे. सत्राचे अध्यक्ष नागेश चौधरी म्हणाले, आपल्या देशात फक्त मुठभर लोक संस्कृत बोलत असले तरी संस्कृतची ७२ विद्यापीठे आहेत. गोंडीसारखी लोकभाषा ३ लाखापेक्षा अधिक आदिवासी बोलत असूनही तिचे एकही विद्यापीठ नाही. भाषा हा राष्ट्रनिर्मितीतील महत्वाचा घटक असल्यामुळे बहुजनांची भाषा नष्ट करून अभिजनांचे राष्ट्र उभारणीचे षडयंत्र रचले जात आहे. डॉ. चेतना सवाई यांनी आयोजनाची भूमिका विषद केली. संचालन नरेन मून यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई यांनी मानले. यशस्वीतेकरिता जिजा बोरकर, सुनिता शंभरकर, प्रमोद नगराळे, नंदू धाबर्डे, प्रा. दत्तानंद इंगोले, प्राचार्य जनार्दन देवतळे, डकरे, मीनल इंगळे, प्रा. महाजन, प्रा. खोडे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)