शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांच्या शोषणासाठीच संस्कृतचा अट्टाहास

By admin | Updated: December 13, 2014 22:45 IST

बहुजनांच्या डोक्यावर सांस्कृतिक अधिपत्य लादण्यासाठीच हिंदू या शब्दाच वापर करणाऱ्या शक्ती बहुजनांना स्वत:ची संस्कृती, भाषा व जीवनच विसरायला भाग पाडत आहे. ज्या भाषेशिवाय आपण

तिसरे लोकभाषा संमेलन : बी. जी. कोळसे पाटील यांचे प्रतिपादनवर्धा : बहुजनांच्या डोक्यावर सांस्कृतिक अधिपत्य लादण्यासाठीच हिंदू या शब्दाच वापर करणाऱ्या शक्ती बहुजनांना स्वत:ची संस्कृती, भाषा व जीवनच विसरायला भाग पाडत आहे. ज्या भाषेशिवाय आपण व्यक्त होऊ शकत नाही त्या भाषिक पातळीवरही बहुजनांचे शोषण सुरू असून संस्कृतचा अट्टाहास हा त्याचाच भाग आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी केले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात तिसरे लोकभाषा संमेलन १३ आणि १४ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर स्वागताध्यक्ष दिनेश सवाई, डॉ. चेतना सवाई, उद्घाटन सत्राचे अध्यक्ष नागेश चौधरी, भाषा अभ्यासक अरूण जाखडे पुणे, कृषी कीर्तनकार महादेव भुईभार, लोकसाहित्यिक डॉ. मधुकर वाकोडे, बबन नाखले, जगन वंजारी, अरविंद देशमुख व संयोजक प्रा. नूतन माळवी उपस्थित होते.न्या. कोळसे पाटील म्हणाले, फुले, आंबेडकरांनी बहुजनांना शिक्षित करण्याचा वसा उचलला. त्यातून शिक्षित झालेल्यांनी संविधानाची प्रस्तावना हातात घेवून शोषण मुक्त समाज निर्मितीसाठी लढले पाहिजे.ज्ञानेश्वर, तुकारामांच्या काळापर्यंत सोपी असलेली मराठी ही मोरोपंतानी बिघडविली असे सांगत मधुकर वाकोडे म्हणाले, भाषा मेली की माणसे मरतात. आज चित्पावनांची भाषा ही प्रमाण भाषा बनल्यामुळे बहुजनांमध्ये सांस्कृतिक न्यूनगंड वाढून त्यांचा बौद्धीक विकास खुंटला आहे. आपल्या देशाव्यापी भाषिक सर्व्हेक्षणाचा अनुभव कथन करताना पद्मगंधाा प्रकाशनचे अरूण जाखडे म्हणाले, आपल्या देशात भाषिक वेदना प्रचंड आहेत. भाषा वाचविण्याचे काम हे केवळ भाषाशास्त्राचे नसून ते संपूर्ण समाजाचे आहे. सत्राचे अध्यक्ष नागेश चौधरी म्हणाले, आपल्या देशात फक्त मुठभर लोक संस्कृत बोलत असले तरी संस्कृतची ७२ विद्यापीठे आहेत. गोंडीसारखी लोकभाषा ३ लाखापेक्षा अधिक आदिवासी बोलत असूनही तिचे एकही विद्यापीठ नाही. भाषा हा राष्ट्रनिर्मितीतील महत्वाचा घटक असल्यामुळे बहुजनांची भाषा नष्ट करून अभिजनांचे राष्ट्र उभारणीचे षडयंत्र रचले जात आहे. डॉ. चेतना सवाई यांनी आयोजनाची भूमिका विषद केली. संचालन नरेन मून यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई यांनी मानले. यशस्वीतेकरिता जिजा बोरकर, सुनिता शंभरकर, प्रमोद नगराळे, नंदू धाबर्डे, प्रा. दत्तानंद इंगोले, प्राचार्य जनार्दन देवतळे, डकरे, मीनल इंगळे, प्रा. महाजन, प्रा. खोडे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)