शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

वाळू माफियांचा मोर्चा तांभा घाटाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 5:00 AM

उन्हाळाभर वाळू चोरट्यांनी हिवरा (कावरे) घाटातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु केला. तो आजही बेधडकपणे सुरुच आहे. पण, यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर लोकमतने वृत्त प्रकाशित केले. आता कारवाईच्या धाकाने येथील वाळू चोरट्यांनी आपला मोर्चा तांभा (येंडे ) येथील घाटाकडे वळविला आहे. या घाटांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात १५ ते २० फुट खोल खड्डे पडले आहे.

ठळक मुद्देहिवरा (कावरे) घाटातही वारेमाप उपसा : देवळी तहसील कार्यालयाकडून कारवाईकडे कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : जिल्ह्यात एकही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरीही देवळी तालुक्यातील वर्धा नदीपात्रात वाळू माफीयांनी सुरुवातीपासूनच धुडगुस घातला आहे. हिवरा (कावरे) आणि तांभा ( येंडे ) येथील वाळू घाटातून दिवसरात्र वाळू उपसा सुरु असल्याने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. वारंवार तक्रार केल्यानंतरही तहसील कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने या वाळू माफियांच्या अवैध उपस्याला तहसील कार्यालयाची मूक संमती असल्याचा आरोप गावकरी करीत आहे.उन्हाळाभर वाळू चोरट्यांनी हिवरा (कावरे) घाटातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु केला. तो आजही बेधडकपणे सुरुच आहे. पण, यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर लोकमतने वृत्त प्रकाशित केले. आता कारवाईच्या धाकाने येथील वाळू चोरट्यांनी आपला मोर्चा तांभा (येंडे ) येथील घाटाकडे वळविला आहे. या घाटांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात १५ ते २० फुट खोल खड्डे पडले आहे. गावातील महिला या नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जातात. तसेच शेतकरी जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर नेतात. त्यामुळे हे खड्डे जीवघेणे ठरू पाहत आहे. गावकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा असताना गावातील सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामविकास अधिकारी कोणतीही भूमिका घेत नसल्याचा आरोप गावकरी करीत आहे.दिवसरात्र या घाटातून बाहेर पडणारी वाहने धावत असतानाही तहसील कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लक्ष्मीदर्शनाने वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक नसल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून ग्रामविकासाला बाधा निर्माण करणाºया वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.परिसरात कोट्यवधीचे वाळू साठेलिलावापूर्वीच वाळू चोरट्यांनी अवैध उपसा करुन वाळू घाट रिकामे केले आहे. आता पावसाळ्यात वाळू उपस्याला ब्रेक लागणार असल्याने आताच वाळू नदीबाहेर काढून त्याचा साठा करण्यावर जोर आहे. हिवरा (कावरे), तांभा (येंडे) व विजयगोपाल या परिसरात मागील १५ दिवसात किमान २५ हजार ब्रास रेतीचा साठा करण्यात आला आहे. साठेबाजीला प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसताना हे साठे गावातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांना दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वाळू चोरीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात ओले केले जात आहे. यातुनच वाळू चोरट्यांना प्रशासनाचीही साथ मिळत आहे. एका ठिकाणी वाळू जमा करुन रात्रीच्या सुमारास टिप्परव्दारे देवळी, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी लॉकडाऊन काळातही वाहतूक होत आहे.गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना आमिषनदीपात्रातून वाळू उत्खनन केल्यानंतर रस्त्यालगतच्या शेतात किंवा या परिसरातील कॅनल लगतच्या भागात साठा केल्या जात आहे. शेतकºयांच्या शेतात किंवा नागरिकांच्या घरासमोर साठा करण्यासाठी त्यांना वाळू चोरटे पैशाचे किंवा वाळूचे आमिष देतात.बºयाच प्रमाणात ते पूर्णही करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. तांभा, हिवरा, विजयगोपाल या गावाच्या सीमेवरती तसेच गावालगतच्या काही शेतामध्ये वाळूचे मोठे साठे असून याची संपूर्ण माहिती तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांना आहे. पण, कारवाई होत नाही, हे दुदैवच म्हणावे लागेल.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया