शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कापूस खरेदीस नकार; शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 6:00 AM

परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत धरून प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपये पर्यंतचे भाव देण्याचे ठरले आहे.

ठळक मुद्देरास्तारोको : सीसीआयने सरसकट ५,५५० भाव द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : कापसाची आद्रता जास्त असल्याने सीसीआयच्यावतीने कापूस खरेदीस नकार देण्यात आला. याच शेतकरी विरोधी निर्णयाच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी वर्धा-यवतमाळ मार्गावर सुमारे अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापसाला सरसकट प्रती क्विंटल ५,५५० रुपये भाव द्यावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रेटली होती. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे आणि पोलिसांच्या मध्यस्थीअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत धरून प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपये पर्यंतचे भाव देण्याचे ठरले आहे. यानंतर आठ ते बारा टक्क्यापर्यंतच्या आद्रतेसाठी क्विंटल मागे ५५ रूपये कमी देण्याचे तसेच बारा टक्क्याचे वरती आद्रता असलेल्या कापसाची खरेदी न करण्याचे धोरण ठरले आहे. शासनाचे निर्देशानुसार हे धोरण राबत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या कापसात १४ ते १६ टक्क्यापर्यंत आद्रता असल्याचे कारण पुढे करीत कापूस खरेदी करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे शेतकºयांचाही पार चढला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच सभापती खडसे व पोलिसांनी मध्यस्ती करीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कापसाची आद्रता तीन ठिकाणी तपासण्याच्या सूचना देत आद्रतेबाबचे धोरण ठरल्याचे सांगितले. सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापसाला सरसकट प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपयांचा भाव द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटली होती. या आंदोलनामुळे काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :StrikeसंपFarmer strikeशेतकरी संप