शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

कोटंबा बंधाऱ्यावर पुलाची निर्र्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 5:00 AM

कोटंबा गावाला लागून तत्कालीन लघुसिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला होता. बंधारा गावालगतच असल्याने गावात पाणी शिरण्याच्या भितीने बंधाऱ्यांची उंची वाढविता आली नाही. ज्या उद्दीष्टासाठी बंधारा बांधण्यात आला त्याची उद्दीष्टपूर्तीच झाली नाही. बंधाऱ्यातून नहरावाटे शेतीला पाणी देण्याची योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनिचे भूसंपादन करून नाममात्र मोबदला देत जमिनी ताब्यात घेत लघुसिंचन विभागाने नहर खोदले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी । सिंचनासाठी सोय पण, वहिवाट थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील कोटंबा येथील बोरनदीपात्रावर सुमारे ३५ वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. नहरावाटे शेती सिंचनाखाली आणण्याची योजना होती. पण, योजना फसली. बंधाºयातील संग्रहीत पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींना बारामाही पाणी राहते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी चांगली सोय झाली पण, वहिवाट मात्र, थांबली असल्याने कोटंबा येथील बंधाऱ्यावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.कोटंबा गावाला लागून तत्कालीन लघुसिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला होता. बंधारा गावालगतच असल्याने गावात पाणी शिरण्याच्या भितीने बंधाऱ्यांची उंची वाढविता आली नाही. ज्या उद्दीष्टासाठी बंधारा बांधण्यात आला त्याची उद्दीष्टपूर्तीच झाली नाही. बंधाऱ्यातून नहरावाटे शेतीला पाणी देण्याची योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनिचे भूसंपादन करून नाममात्र मोबदला देत जमिनी ताब्यात घेत लघुसिंचन विभागाने नहर खोदले. कोरडवाहू शेती ओलीताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद होता. तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यातून नहरात पाणी सोडण्याचा प्रयोग झाला पण, पाण्याला प्रेशर नसल्याने हा प्रयोग फोल ठरला. बंधाºयाची उंची कमी पडली, जर उंची वाढविली तर गावात पाणी शिरण्याचा धोका, अशा विवंचनेत अधिकारी व अभियंते होते. तेव्हापासून हा बंधारा पाणी संचय करण्याच्या कामाचाच ठरला आहे. शेतकºयांच्या शेतातून खोदलेले नहर १० ते २० वर्षे तसेच होते. मात्र, पाणीच येणार नाही याची खात्री झाल्यावर शेतकºयांनी ते बुजवून टाकले. काही वर्षांपूर्वी बंधाºयाला मोठाले छिद्र पडले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता. हळूहळू मोठा भाग खचला, पण, कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही.लोकमतने याबाबत वारंवार पाठपुरावा केला. कोटंबा येथील गावकºयांनीही बंधाºयावरील पुलाची मागणी रेटून धरली. तत्कालीन आमदार प्रा. सुरेश देशमुख हे सिंचन मंडळाचे उपाध्यक्ष असतांना त्यांनी बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करून दुरूस्ती केली. आज या बंधाºयात पाण्याचा मोठा संचय असतो. शेतकऱ्यांनी ओलीतासाठी मोटरपंप लावली आहे. पाणीसाठ्यामुळे परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांनाही फायदा झाला आहे. मार्च महिन्यात बंधारा ओसंडून वाहत आहे. बंधाऱ्यावर बांधण्यात आलेल्या रपट्यावरून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांची वहिवाट रखडली आहे. त्यामुळे बंधाºयावरील पुलाची निर्मिती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.रहदारीला निर्माण होतोय अडथळाबोर नदीपात्रावरील बंधाऱ्यासमोरून सेलू, धानोली (मेघे) मार्गे कोटंबा, धपकी, चारमंडळ असा रस्ता आहे. बंधाऱ्या समोर सिमेंट पाईप टाकून बुडीत रपटा तयार करण्यात आला आहे. त्यावरून रहदारी असते. मात्र, पाणी वाढले की रहदारी रखडत असल्याने मोठ्या पुलाच्या निर्मितीची गरज आहे.कोटंबा बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील व परिसरातील गावातील पाण्याचे स्त्रोत वाढले याचा फायदाच आहे. बंधाऱ्या समोर असलेला रपटा पावसाळ्यात धोक्याचा व रहदारीत अडचण आणणारा ठरतो. त्यामुळे पुलाची निर्मीती केल्याच कायमची चिंता मिटेल.- पंढरी खापरे, शेतकरी चारमंडळ, सेलू.