शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

निवडणुकीच्या नावावर तहसील कार्यालय रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:54 PM

येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना हेलपाटे : कार्यालयाची सुरक्षाही वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे.तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना शिधा पत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदीची गरज असल्याने ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या कार्यालयात येतात. विशेषत: २५ पायऱ्या चढून या कार्यालयात जावे लागत असल्याने याचा वयोवृद्धांना मोठा त्रास होत आहे. त्यातही कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घ्यावे लागत आहे. बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात राहत असून त्यांना विचारणा केल्यावर तेही उडवाउडवीचे उत्तर देत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगतात. काही कर्मचारी तर आलेल्यांना दमदाटी करीत कुणाला तक्रार करायची असेल त्यांच्याकडे तक्रार करा, असा उपराटा सल्लाही देत असल्याने नागरिकांचा पारा चढत आहे.शुक्रवारी आमगाव (खडकी) येथील वृद्ध नागरिक नामदेव रामाजी नेहारे हे सकाळी ११ वाजता स्टॅम्प अपेडेव्हीट करण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी तहसील कार्यालयातील सर्व टेबलवर चौकशी केली पण कुणीही माहिती दिली नाही. कामाच्या प्रतीक्षेत इतक्या उन्हाच्या तीव्रतेत दुपारी अडीच वाजतापर्यंत ताटकाळत राहीले. परंतू एकही अधिकारी व कर्मचारी उपलब्ध झाला नाही. हाच अनुभव इतरही नागरिकांना आला.तहसील कार्यालय सकाळी १० वाजता उघडले असले तरी १०.३० वाजतापर्यंत एकही कर्मचारी या कार्यालयात उपस्थित नव्हता.त्यामुळे कार्यालयातील वस्तू व दस्तऐवजाची सुरुक्षा वाºयावरच असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण सांगितले जात होते तर आता लोकसभा निवडणुकीचे कारण दिले जात असल्याने नागरिकांनी किती दिवस प्रतीक्षा करावी, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे....तर कार्यालय कुलूप बंद ठेवावेकार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना सध्या निवडणुकीच्या कामांचा व्यस्त असल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आल्यापावलीच परतावे लागत असल्याने कारण देण्यापेक्षा कार्यालयच कुलूप बंद करुन ठेवा, असा संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :TahasildarतहसीलदारElectionनिवडणूक