शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे काहींनी कापणी करून ढीग लावले. त्यांचे ढीग ओलाव्याने खराब होत आहे. ज्यांना ढीग करणे शक्य झाले नाही, त्याचे सोयाबीन शेतात ओले होत आहे.

ठळक मुद्देशेतकरीबांधवांची मागणी : सर्वेक्षणाचा फार्स नको, सततच्या पावसामुळे सोयाबीनचे ढीग भिजलेत

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खरिपातील सोयाबीन पिकाला सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. खरे पाहता सर्वेक्षण करण्याचीही गरज नाही. सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक प्रभावित झाले आहे. अशावेळी विमा कंपन्यांनी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा हप्ता भरला आहे, त्यांना कंपनीकरवी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित मिळावी, अशी सोयाबीन उत्पादकांची मागणी आहे.अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे काहींनी कापणी करून ढीग लावले. त्यांचे ढीग ओलाव्याने खराब होत आहे. ज्यांना ढीग करणे शक्य झाले नाही, त्याचे सोयाबीन शेतात ओले होत आहे. तर ज्यांनी सवंगणी केली नाही, त्या झाडांवरील शेंगांना अंकुर फुटत आहे.अनेकांनी कापणी न करता शेतात जनावरे सोडली. अनेक शेतकरी उघाड पडल्याबरोबर शेतात रोटावेटर फिरवून सोयाबीनची उभी झाडे जमिनीत गाडण्याच्या विचारात आहेत. एकंदरीत सर्वेक्षण करून नुकसानीचा अंदाज घेण्याची काहीच गरज नाही. सर्वच शेतातील सोयाबीनची अवस्था पेरले एक पोते, झाले अर्धा पोते तर खर्च एकरी १० ते १५ हजार. उत्पन्न मात्र शून्य रूपये अशी आहे. म्हणून पीक विमा कंपन्यांनी ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन सोयाबीन उत्पादकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच पीक विमा वाढण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी कंपन्यांची वकिली करणाऱ्या महसूल विभाग, कृषी विभाग व बँकांच्या प्रशासनाने याकामी शेतकऱ्यांचे वकीलपत्र स्वीकारत पुढाकार घेऊन भरपाई देण्यास कंपनी प्रशासनाला बाध्य करावे, अशी भावना जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. नैसर्गिकचार एकरात सोयाबीन पेरले. सर्व काळजी घेऊन पीक तयार केले. पीकही चांगले आले. पावसाने थोडी उसंत देताच प्रतिएकर दोन हजार रुपये मजुरीने सवंगणी केली. शेतातील लहान-लहान ढीग उचलण्याआधीच सतत पाऊस येत असल्याने शेतांतील ढीग पूर्ण सडले असून पीक खराब झाले आहे.- प्रशांत गलाट, शेतकरी, दिघी (हिवरा).

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा