शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्ह्यात ‘समृद्धी’ अन् घरांमध्ये ‘वादावादी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून ६०.७३ किलोमीटरचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग गेला आहे. या महामार्गाकरिता या तिन्ही तालुक्यातील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून शेतकऱ्यांना सरळ खरेदीतून ३७९.८८ कोटींचा मोबदलाही दिला आहे. या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडे ‘समृद्धी’ आली असतानाही अनेकांच्या घरामध्ये याच ‘समृद्धी’मुळे वाद उफाळून आले आहेत.

ठळक मुद्देतीन तालुक्यांमधून गेला महामार्ग : न्यायालयात २७ जणांचे वाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘पैसा आणि संपत्ती’ या दोन गोष्टी रक्ताच्या नात्यांनाच नाही तर जन्मदात्यांनाही विसरायला भाग पाडतात. अशीच काहीशी परिस्थिती सध्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे निर्माण झाली आहे. तीन तालुक्यातील शेतजमिनी या महामार्गाकरिता अधिग्रहीत करण्यात आल्या असून शासनाकडून भरमसाठ मोबदलाही देण्यात आला. ही रक्कम पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या आणि उभ्या आयुष्यात शेताचा धुराही न पाहणाऱ्यांनी केवळ पैशाच्या हव्यासापोटी मी ही या जमिनीचा वारसदार असा कांगावा सुरू केला. परिणामी, घरांमध्ये वाद सुरू होऊन हा वाद चार भिंतींच्या कक्षा ओलांडून थेट न्यायालयात पोहोचला.वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून ६०.७३ किलोमीटरचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग गेला आहे. या महामार्गाकरिता या तिन्ही तालुक्यातील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून शेतकऱ्यांना सरळ खरेदीतून ३७९.८८ कोटींचा मोबदलाही दिला आहे. या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून तिन्ही तालुक्यातील शेतकºयांकडे ‘समृद्धी’ आली असतानाही अनेकांच्या घरामध्ये याच ‘समृद्धी’मुळे वाद उफाळून आले आहेत. नोकरी लागल्यानंतर किंवा गाव सोडल्यानंतर नुकसानीचा धंदा म्हणून अनेकांनी शेतीकडे दुर्लक्ष केले.भावंडं, वडील किंवा नातेवाईकांकडे शेतीची जबाबदारी सोपवून मोकळे झाले. ज्यांनी जबाबदारी स्वीकारली, त्यांनी अनेक उन्हाळे-पावसाळे शेतीच्या मशागतीसाठी घालवून शेती सुपीक ठेवली.बºयाचदा त्यांना निसर्गकोपाचाही फटका सहन करावा लागला. मात्र, समृद्धी महामार्गाचा कोट्यवधीचा मोबदला पाहून सारेच तुटून पडले. उभ्या आयुष्यात शेतीचा गंध नसणाऱ्यांनी आता हिस्से वाटपासाठी दंड थोपटले आहे. मीही या जमिनीचा वारसदार असल्याने मलाही मोबदला हवा आहे, असे वाद काही घरांमध्ये निर्माण झाले आहे. काही हातघाईवर आले तर काहींनी पोलीस ठाण्याचीही पायरी चढली.इतकेच नव्हे, तर आर्वी, वर्धा व सेलू या तिन्ही तालुक्यातील २८ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.महामार्गामुळे शेतकरी झाले सजगनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे अनेकांना ताळ्यावर आणले आहे. एकाच परिवारातील व्यक्तींनी शेताचे विभाजन न करता पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसारच आतापर्यंत शेती केली आहे. त्यामुळे शेताची वहिवाट एकाकडे असतानाही सातबाºयावर मात्र अनेकांची नावे आहेत. परिणामी, समृद्धी महामार्गाच्या मिळालेल्या मोबदल्याला सर्वच वारसदार ठरले. अनेकांनी हा वारसाहक्क घेण्यासाठी हात पुढे केल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला. इतकेच नव्हे, तर एका कुळातील असल्याने सातबाºयावर नाव नसतानाही मी ही या जमिनीचा वारसदार आहे, असा कांगावा करीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आता वेळीच आपल्या हिस्साची शेती वेगळी करून वहिवाट करण्याचा निर्णय बहुतांश शेतकºयांनी घेतला आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग