शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

कृषी कर्ज वसुली स्थगित करा

By admin | Updated: December 13, 2014 22:45 IST

सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती असून शासनही मदतीवर विचार करीत आहे़ असे असताना स्टेट बँक आॅफ इंडियाद्वारे शेतकऱ्यांना थकित कर्ज वसुलीसाठी नोटीसी बजावल्या आहेत़ यामुळे त्रस्त देवळी

शेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेवर्धा : सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती असून शासनही मदतीवर विचार करीत आहे़ असे असताना स्टेट बँक आॅफ इंडियाद्वारे शेतकऱ्यांना थकित कर्ज वसुलीसाठी नोटीसी बजावल्या आहेत़ यामुळे त्रस्त देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करीत न्यायाची मागणी केली़ देवळी तालुक्यातील सुमारे ७०० शेतकऱ्यांना स्टेट बँक शाखेने मागील थकित कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस बजावल्या़ यात मूळ रक्कम व तितकेच व्याज आकारून १३ डिसेंबर रोजी तालुका विधीसेवा प्राधिकरण येथे हजर राहण्यास बजावण्यात आले़ यानुसार शेतकऱ्यांनी हजेरी लावली; पण येथे न्याय मिळण्याची शक्यता कमीच दिसून आली़ देवळी तालुका व परिसरात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सावट आहे. यंदाही ५० टक्क्यांच्या आत आणेवारी आहे़ असे असताना बँकेने कर्जाचा तगादा लावला आहे. देवळीच्या बँकेने ७०० च्या वर नोटीस दिल्या आहेत़ यामुळे पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी याकडे त्वरित लक्ष देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली़ शेतकऱ्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करावे, मूळ रकमेचे किस्ती पाडून देण्यात याव्या, अशी मागणी अब्दुल जब्बार, संजय देशमुख, महादेव तेलरांधे, वसंत राऊत, मारोती रूद्रकार, जीवन मेंघरे, राहुल उगेमुगे, विठ्ठल तेलरांधे, गणपत पोटे, देवदत्त डफरे, गणेश महल्ले आदी शेतकऱ्यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)