शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

११ एकर नदीपात्राची श्रमदानातून नांगरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:00 IST

श्रीक्षेत्र टाकरखेड येथे नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाणी फाऊंडेशन आणि लोकप्रतिनिधी, अंगणवाडीसेविका आदींनी पुढाकार घेत ११ एकरातील वर्धा नदीपात्र ट्रॅक्टरद्वारे नांगरले.

ठळक मुद्देपावसाचे जिरणार पाणी : जलसंकटावर मात करण्याचा टाकरखेडवासीयांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : श्रीक्षेत्र टाकरखेड येथे नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाणी फाऊंडेशन आणि लोकप्रतिनिधी, अंगणवाडीसेविका आदींनी पुढाकार घेत ११ एकरातील वर्धा नदीपात्र ट्रॅक्टरद्वारे नांगरले.१९ मे ला सकाळी ७ वाजता पाणी फाऊंडेशनची चमू, सरपंच सारिका मेश्राम, विनोद डोये, विजय भुरभुरे, सुधीर देशमुख, रोजगारसेवक शरद पेठे, वैशाली वानखेडे, मारोतराव शेंडे, उपसरपंच नंदा नेवारे, सदस्य मंजूषा मोकलकर, अंगणवाडीसेविका मंजूषा डोये, छाया पेठे यांनी याकरिता पुढाकार घेतला.तब्बल ४० वर्षांनंतर नदीपात्र कोरडे झाले. यामुळे पाणीसमस्या गंभीर झाली. पुढीलवर्षी तरी जलसंकट निर्माण होऊ नये म्हणून पाणी फाऊंडेशनच्या वतीने नदी नांगरणीचा नावीन्यपूर्ण उपक्रम टाखरखेड ग्रामस्थांनी श्रमदानातून राबविला. पावसाचे पाणी जेव्हा पडेल तेव्हा अधिकाधिक नदीपात्रात मुरले पाहिजे. पावसाचे पडलेले पाणी वाहून न जाता मातीच्या गर्भात ते पाणी साचले पाहिजे, जेणेकरून टाकरखेड शिवारामधील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींची पाण्याची पातळी वाढेल आणि जलसंकटातून सुटका होईल.नदीपात्रातील माती घट्ट झाल्याचे नांगरणीवेळी ग्रामस्थांना जाणवले. बऱ्याच वर्षांपासून वरच्या भागाची माती सिंमेटसारखी पक्की झालेली होती. नदीपात्राच्या नांगरणीमुळे मातीचा मुरूम झालेला असून या मातीत आता जास्तीत जास्त पाणी वाहून न जाता मुरणार, जिरणार आहे. जिरलेल्या, थांबलेल्या पाण्याचा फायदा टाकरखेड शिवाराला येत्या काळात होणार असून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे. या सर्व श्रमदानात टाकरखेड येथील सर्व ट्रॅक्टरमालकांनी स्वत:चे डिझेल वापरून तब्बल दोन तास नदीपात्राची नांगरणी केली. यात प्रामुख्याने रमेश सहारे, संदीप पेठे, अनिल लांजेवार, गौतम काळबांडे, विजय अतकरणे, रोशन भुरभुरे, रमेश गाऊत्रे तसेच परतोडा येथील सुभाष यादव व अतुल डोंगरे आदींनी दुष्काळाशी दोन हात, माती अडवा पाणी जिरवा या तत्त्वासाठी युद्धपातळीवर तांत्रिक व आर्थिक सहाय्य केले.