शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

देशभरातील यात्रेकरू येणार गांधी आश्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

यात्रेत वेगवेगळ्या २०० ठिकाणावरून निघालेले ६०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था यात्री निवास आणि नयी तालिम समिती परिसरात करण्यात आली आहे. यात्रेतील पदयात्री आश्रमात पोहचल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्यावतीने सूतमाळेने स्वागत करण्यात येईल. सर्व यात्रेकरू सायंकाळी प्रार्थनेत सहभागी होतील. यात्री निवास परिसरात यात्रेकरूंचे अनुभव कथन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देविनोबांची जयंती : गुरूवारी पाहुणे पवनारला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : यंदा आचार्य विनोबा भावे यांचे १२५ जयंती वर्ष साजरे होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जन्मदिनी मित्र मिलनचे पवनार येथे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात या निमित्ताने विचार, कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा या साठी सर्वोदयींनी यात्रा काढली आहे. यात्रा बुधवारी १३ रोजी सायंकाळी सेवाग्राम आश्रमात पोहचणार आहे.या यात्रेत वेगवेगळ्या २०० ठिकाणावरून निघालेले ६०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था यात्री निवास आणि नयी तालिम समिती परिसरात करण्यात आली आहे. यात्रेतील पदयात्री आश्रमात पोहचल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्यावतीने सूतमाळेने स्वागत करण्यात येईल. सर्व यात्रेकरू सायंकाळी प्रार्थनेत सहभागी होतील. यात्री निवास परिसरात यात्रेकरूंचे अनुभव कथन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरूवारी सकाळी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यात्रेला हिरवी झेंडी दाखवून यात्रा पवनार दिशेने रवाना होईल.सिंधूदुर्ग येथून येणार यात्रासिंधूदुर्ग जिल्ह्यातील गोपूरी आश्रमातून संवाद यात्रा निघाली आहे. हे वर्ष महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती, आचार्य विनोबा भावे,कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन शतकोत्तर रजत जयंती आणि प्रकाश मोहाडीकर जन्मशताब्दी संयुक्त अभियान अंतर्गत संवाद यात्रा काढलेली आहे. सदर यात्रा १४ रोजी वर्धेत पोहचणार असून १५ रोजी पवनार येथील ब्रम्ह विद्या मंदिरात या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकसंवाद घालण्यात येणार आहे.देशभरातून यात्रेकरू सेवाग्राम आश्रमात येणार आहे. त्यांचे स्वागत आणि मनोगताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. १५ ते १७ पर्यंत पवनार येथे विनोबाजींच्या जन्मदिनानिमित्य विनोबा मित्र मिलन कार्यक्रम होणार आहे.सर्व यात्रेकरू त्यात सहभागी होतील. सेवाग्राम येथूनच ते पवनार येथे जातील.- टी.आर.एन.प्रभू,अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सर्वोदयी येत आहे. बा,बापू आणि बाबांना मानणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने जिल्ह्यात त्यांचे स्वागत आहे.- मोहन खैरकार, अध्यक्ष जिल्हा सर्वोदय मंडळ.