शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

१५ दिवसापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:09 PM

मुख्यमंत्री सडक योजना (१६-१७)अंतर्गत महामार्ग क्र. ६ ते दाभापर्यंत बांधण्यात आलेल्या १.६ कि़मी.चा डांबरी रस्ता, केवळ १५ दिवसात पहिल्या पावसाने खराब झाला आहे. या दुरावस्थेमुळे रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल सर्वत्र शंका व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देरस्त्याचे काम अपूर्णच : कडा पक्क्या मुरुमाने भरल्या नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : मुख्यमंत्री सडक योजना (१६-१७)अंतर्गत महामार्ग क्र. ६ ते दाभापर्यंत बांधण्यात आलेल्या १.६ कि़मी.चा डांबरी रस्ता, केवळ १५ दिवसात पहिल्या पावसाने खराब झाला आहे. या दुरावस्थेमुळे रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल सर्वत्र शंका व्यक्त केली जात आहे. बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल सखोल चौकशी करुनच संबंधित ठेकेदाराला बांधकामाची रक्कम अदा करावी, अशी मागणी जनेतेने केली आहे.मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत ७२.४ लक्ष प्राकलन किंमत असलेला महामार्ग क्र. ६ ते दाभापर्यंत बांधण्यात आलेल्या १.६ कि़मी. रस्ता, डांबरीकरण व मजबुती करण्यासाठी मंजुर झाला. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था वर्धा येथील अभियंताच्या देखरेखीखाली शासकीय कंत्राटदाराचे मार्फत या रस्त्याचे बांधकाम १८ मे २०१७ ला सुरू करुन १७ मे २०१८ ला पूर्ण करायचे होते.भूमीपूजनानंतर दोन महिन्यांनी कामाला पावसाचे तोंडावर सुरुवात झाली. १.६ कि़मी. रस्त्याचे डांबरीकरण, एक मोठा पुल व दोन रपटे या बांधायचे होते. संबंधित कंत्राटदाराने पावसाच्या भीतीने अत्यंत लगबगीने कसेबसे रस्त्याचे काम सुरू केले. आणि अवघ्या एका महिन्यात संपविले. त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ठ राहीला. काम पूर्ण झाल्यावर पंधरा दिवसातच पहिल्या पावसाने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबर कमी वापरल्यामुळे गिट्टी उघडी पडली आहे. नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम अद्यापही अपूर्णच आहे, दोन रपट्याचे काम पूर्ण झाले नाही.पुलाचे बाजुला काढलेला वाहतूक रस्ता पावसाने वाहुन गेला. दाभा गावाजवळील मुख्य पुल बांधकाम अपूर्ण राहिल्याने नदीचे पाणी शेजारच्या शेतात घुसून शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कडेला पक्का मुरुम न भरल्यामुळे रस्त्याखाली वाहने उतरणे धोकादायक व अपघाताला निमंत्रण देणारे झाले आहे. अनेक ठिकाणी हा नवीन केलेला रस्ता दबला गेला आहे. रस्त्याचा उतार व्यवस्थित काढल्या गेल्या नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून डांबरीरस्ता खराब होतो आहे. बांधकामाची मुदत संपली तरी मुख्य पुल व दोन रपट्याचे काम अपूर्णच आहे. ते केव्हा होणार, दर्जेदार होणार किंवा नाही हा ही प्रश्न आहे.रस्त्याची दुरावस्था पाहुन या रस्त्याच्या बांधकामाची पाहणी संबंधित अधिकाºयांनी केली की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. बांधकाम तपासणी केल्या शिवाय ठेकेदाराला रक्कम अदा करु नये अशी नागरिकांची मागणी आहे.याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.अधिकारी व कंत्राटदाराचे साटेलोटेमुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो वा पंतप्रधान ग्राम सडक योजना असो यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत आहे. कॉग्रेस सरकारच्या काळात या योजनेमध्ये गैरप्रकार जिल्ह्यात झाले आताही हाच प्रकार सुरू आहे. अधिकारी व कंत्राटदार यांच्या आर्थिक संबधामुळे निकृष्ट दर्जाचे काम करण्याची हिंमत कंत्राटदाराची होते अशा आरोप होत आहे.पुलाला भेगा पडल्याने अपघातास निमंत्रणबोरधरण - बोरी गावाला लागूनच असलेल्या पुलाला मोठया भेगा पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे प्रवाश्याना पुलाच्या दुसऱ्या बाजुने येजा करावी लागते बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.सेलु तालुक्यातील बोरधरण हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद आहे .व्याघ्र प्रकल्प असल्याने पर्यटक दुरवरुन येतात पर्यटकांना बोरी या गावावरून बोरधरणला जावे लागते बोरी गावालाच लागुनच रस्त्यावर पुल आहे त्या पुलाला मोठी भेग पडली व आतील भाग पोकळ असल्याचे दिसुन येते येणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.बोरधरण येथे हवसे नवसे पर्यटक सुटीचा आनंद लुटण्याकरिता येतात बाहेर जिल्ह्यातून सुध्दा पर्यटक बोरधरण बघण्यासाठी येत असते. बोरी येथील पुलाला भेग पडून पुलाच्या भिंतीला सुध्दा भेगा पडल्याचे दिसून येते अशातच या जागेवरून मोठे वाहन बस,टॅव्हलस, चार चाकी वाहन जात असताना तो पुल दबल्यास त्या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकते त्या पुलावरून वाहन चालक आपले वाहन दुसºया भागातून काढत असते तर दुसºया वाहनांना पलीकडे थांबावे लागते पुलाला कठडेही नसल्याने वाहन पुलाच्या काठावरून व ज्या ठिकाणी भेग पोकळ जागा आहे त्या ठिकाणावरून नागरिकांना व पर्यटकांना आपली वाहने न्यावी लागते वरिष्ठांनी पुलाची पाहणी करून पुल दुरस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याच भागात दोन पूल केवळ पायल्या टाकून करण्यात आले आहे.

टॅग्स :Governmentसरकार