शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण सापडण्याची गती वाढली; पण परिस्थिती ‘इन कंट्रोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज द्विशतकाहून अधिक कोविड बाधित नवीन रुग्ण सापडत आहेत. नवीन कोविड बाधितांपैकी लक्षण विरहीत तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तिंना स्वयंघोषणा पत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. ज्या कोविड बाधिताच्या घरी अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, अशा व्यक्तिंना सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देबेड्स मुबलक; चिरीमिरीच्या गैरप्रकाराला सध्यातरी थारा नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  जिल्ह्यात सध्या कोविडबाधित नवीन रुग्ण सापडण्याची गती वाढली आहे. त्यामुळे सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. असे असले तरी सध्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती ‘इन कंट्रोल’ असल्याने   तसेच दोन्ही रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असल्याने पैसे द्या अन् बेड्स उपलब्ध करून घ्या, या चिरीमिरीच्या गैरप्रकाराला थारा नसल्याचे आरोग्य यंत्रणेतील सुत्रांनी सांगितले.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज द्विशतकाहून अधिक कोविड बाधित नवीन रुग्ण सापडत आहेत. नवीन कोविड बाधितांपैकी लक्षण विरहीत तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तिंना स्वयंघोषणा पत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. ज्या कोविड बाधिताच्या घरी अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, अशा व्यक्तिंना सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे सध्यातरी मोठा ताण कोविड रुग्णालयांवर ओढवलेला नाही. असे असले तरी गंभीर रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.सध्यास्थितीत त्रिसूत्रींचे पालन आवश्यकचसध्याच्या कोरोना काळात प्रत्येक नागरिकाने वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसे आवाहनही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सध्या कोविड बाधित नवीन सापडण्याची गती वाढली आहे. असे असले तरी सध्या जिल्ह्याची परिस्थिती इन कंट्रोल आहे. परंतु, नागरिकांनी गाफील न राहता जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. नागरिक गाफील राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या