शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

कपाशी, सोयाबीनवर अळ्यांचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:00 IST

हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकित केले होते; पण विदर्भासाठी ते फोल ठरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ६५ टक्के पाऊस झाला असून २५ टक्के तूट आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के पावसाची तूट : रबी हंगामाला पाणी मिळणे कठीण, जलसंकट अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकित केले होते; पण विदर्भासाठी ते फोल ठरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ६५ टक्के पाऊस झाला असून २५ टक्के तूट आहे. एकूण पर्जन्यमानाचा विचार केल्यास ही तूट ४० टक्केच्या घरात आहे. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्याने तूट भरून निघणे कठीण मानले जात आहे. परिणामी, पिकांवर विविध रोग, अळ्यांनी आक्रमण केले असून रबी हंगाम धोक्यात आला आहे.वर्धा जिल्ह्यात सरासरी ९२०.७१ मिली मीटर पावसाची नोंद होते; पण मागील वर्षीपासून पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. गतवर्षी ८३०.६३ मिमी तर यंदा आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत केवळ ६००.३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी २५.१ टक्के पाऊस कमी पडला असून एकूण सरासरीचा विचार केला तर ४० टक्केपेक्षा अधिक पाऊस कमी झाला आहे. अत्यल्प पावसाचा पिकांसह पूढील हंगाम आणि उन्हाळ्यातील पाणी वितरणावर विपरित परिणाम होणार आहे. यासाठी सिंचन विभागाला नियोजन करावे लागणार असून रबी हंगामातील पाणी पाळ्यांमध्ये कपात करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जात आहे.अत्यल्प पावसामुळे पिकांवर मोठेच संकट ओढवले आहे. जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन हे मुख्य पीक मानले जाते. या पिकांवरच शेतकºयांची भिस्त असते. सध्या ही पिके फुलांवर, पातीवर असताना अळ्यांचा प्रकोप वाढला आहे. परिणामी, उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ९७ टक्के आणि नियोजनाच्या ९९ टक्के पेरणी झालेली आहे. दुबार पेरणी झाली नसल्याचे कृषी विभाग सांगत असले तरी शेतकºयांनी मात्र दुबार, तिबार पेरणी करावी लागल्याची ओरड होत आहे. आता कष्टाने फुलविलेल्या पिकांवर अळ्यांचा प्रकोप दिसत असल्याने शेतकरी धायकुतीला आले आहेत. मुसळधार पाऊस न आल्यास पिकांची स्थिती कठीण असल्याचेच बोलले जात आहे.तीनही उपविभागांमधील पिकांवर रोगांचे आक्रमणजिल्ह्यातील आर्वी, वर्धा आणि हिंगणघाट या तीनही उपविभागांमध्ये कपाशी आणि सोयाबीन पिकांवर अळ्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून उंटअळी व पाने खाणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. लवकर पेरणी झालेले कपाशी पीक फुलोरा अवस्थेत असून उशिरा पेरणी झालेले पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. सेलू तालुक्यात १० टक्के पिकांवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव असून देवळीतही हीच स्थिती आहे.कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करीत असले तरी पावसाच्या अभावामुळे पिकांच्या स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा नसल्याचे शेतकरी सांगतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकडून प्राप्त बोंड अळी नियंत्रणाचे संदेशही शेतकºयांना दिले आहेत. यानुसार शेतकरी फवारणी करीत आहे.व्हायरसचाही अटॅकसोयाबीन पिकावर देवळी तालुक्यातील काही भागात व्हायरसचा अटॅक आहे. अत्यल्प पाऊस व अळ्यांच्या आक्रमणामुळे हातचे जाण्याची शक्यता असलेले पीक आता व्हायरसच्या अटॅकमुळे उत्पादन देणार की नाही, ही शंकाच आहे. बचावाकरिता कृषी विभाग उपाययोजना सूचवित आहे; पण पीक वाचविता येणार की नाही, ही धास्ती आहे. दोन्ही पिकांवर विविध रोग व अळ्या असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.सिंचनाला धोकाप्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा न झाल्याने रबी हंगामातील पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. धाम प्रकल्पात पाणी असल्याने पिण्याचे पाणी मिळणार असले तरी सिंचन धोक्यात येणे अटळ मानले जात आहे.