शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी, सोयाबीनवर अळ्यांचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:00 IST

हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकित केले होते; पण विदर्भासाठी ते फोल ठरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ६५ टक्के पाऊस झाला असून २५ टक्के तूट आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के पावसाची तूट : रबी हंगामाला पाणी मिळणे कठीण, जलसंकट अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकित केले होते; पण विदर्भासाठी ते फोल ठरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ६५ टक्के पाऊस झाला असून २५ टक्के तूट आहे. एकूण पर्जन्यमानाचा विचार केल्यास ही तूट ४० टक्केच्या घरात आहे. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्याने तूट भरून निघणे कठीण मानले जात आहे. परिणामी, पिकांवर विविध रोग, अळ्यांनी आक्रमण केले असून रबी हंगाम धोक्यात आला आहे.वर्धा जिल्ह्यात सरासरी ९२०.७१ मिली मीटर पावसाची नोंद होते; पण मागील वर्षीपासून पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. गतवर्षी ८३०.६३ मिमी तर यंदा आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत केवळ ६००.३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी २५.१ टक्के पाऊस कमी पडला असून एकूण सरासरीचा विचार केला तर ४० टक्केपेक्षा अधिक पाऊस कमी झाला आहे. अत्यल्प पावसाचा पिकांसह पूढील हंगाम आणि उन्हाळ्यातील पाणी वितरणावर विपरित परिणाम होणार आहे. यासाठी सिंचन विभागाला नियोजन करावे लागणार असून रबी हंगामातील पाणी पाळ्यांमध्ये कपात करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जात आहे.अत्यल्प पावसामुळे पिकांवर मोठेच संकट ओढवले आहे. जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन हे मुख्य पीक मानले जाते. या पिकांवरच शेतकºयांची भिस्त असते. सध्या ही पिके फुलांवर, पातीवर असताना अळ्यांचा प्रकोप वाढला आहे. परिणामी, उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ९७ टक्के आणि नियोजनाच्या ९९ टक्के पेरणी झालेली आहे. दुबार पेरणी झाली नसल्याचे कृषी विभाग सांगत असले तरी शेतकºयांनी मात्र दुबार, तिबार पेरणी करावी लागल्याची ओरड होत आहे. आता कष्टाने फुलविलेल्या पिकांवर अळ्यांचा प्रकोप दिसत असल्याने शेतकरी धायकुतीला आले आहेत. मुसळधार पाऊस न आल्यास पिकांची स्थिती कठीण असल्याचेच बोलले जात आहे.तीनही उपविभागांमधील पिकांवर रोगांचे आक्रमणजिल्ह्यातील आर्वी, वर्धा आणि हिंगणघाट या तीनही उपविभागांमध्ये कपाशी आणि सोयाबीन पिकांवर अळ्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून उंटअळी व पाने खाणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. लवकर पेरणी झालेले कपाशी पीक फुलोरा अवस्थेत असून उशिरा पेरणी झालेले पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. सेलू तालुक्यात १० टक्के पिकांवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव असून देवळीतही हीच स्थिती आहे.कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करीत असले तरी पावसाच्या अभावामुळे पिकांच्या स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा नसल्याचे शेतकरी सांगतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकडून प्राप्त बोंड अळी नियंत्रणाचे संदेशही शेतकºयांना दिले आहेत. यानुसार शेतकरी फवारणी करीत आहे.व्हायरसचाही अटॅकसोयाबीन पिकावर देवळी तालुक्यातील काही भागात व्हायरसचा अटॅक आहे. अत्यल्प पाऊस व अळ्यांच्या आक्रमणामुळे हातचे जाण्याची शक्यता असलेले पीक आता व्हायरसच्या अटॅकमुळे उत्पादन देणार की नाही, ही शंकाच आहे. बचावाकरिता कृषी विभाग उपाययोजना सूचवित आहे; पण पीक वाचविता येणार की नाही, ही धास्ती आहे. दोन्ही पिकांवर विविध रोग व अळ्या असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.सिंचनाला धोकाप्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा न झाल्याने रबी हंगामातील पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. धाम प्रकल्पात पाणी असल्याने पिण्याचे पाणी मिळणार असले तरी सिंचन धोक्यात येणे अटळ मानले जात आहे.