शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

कोरोनाच्या सावटात इतर रुग्ण लॉक डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण ९ मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर शासकीयस्तरावर कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. २२ मार्चपासून देश पातळीवर लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे नागरीक मागील ३ महिण्यांपासून घरातच बंदिस्त झाले आहे. विशेत: ६० वर्षाच्या वरील नागरिकांना विविध प्रकारच्या व्याधी असल्यातरी त्यांना या काळात रूग्णालयात जाण्यासही मोठी अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देडॉक्टरही भेटणे कठीणच : ज्येष्ठ नागरिकांसमोर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ९ मार्चपासून राज्यात कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोणाच्या या साथीत इतर आजारांचे रूग्ण घरातच लॉकडाऊन झाल्याचे चित्र शहरी व ग्रामीण भागात दिसून येत आहे.राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण ९ मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर शासकीयस्तरावर कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. २२ मार्चपासून देश पातळीवर लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे नागरीक मागील ३ महिण्यांपासून घरातच बंदिस्त झाले आहे. विशेत: ६० वर्षाच्या वरील नागरिकांना विविध प्रकारच्या व्याधी असल्यातरी त्यांना या काळात रूग्णालयात जाण्यासही मोठी अडचण निर्माण झाली आहे.अनेकजण शहरातील खाजगी डॉक्टरांकडे उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू, बीपी तपासणे, मणक्याचे आजार यासह अनेक आजाराच्या उपचारासाठी जात होते. मात्र कोरोनाच्या भितीपोटी अशा रूग्णांनी डॉक्टरकडे जाणेही टाळले. बरेच डॉक्टर केवळ मोबाईलवरच औषंधाबाबत माहिती सांगत आहेत.दवाखान्यात येऊ नका, असा थेट सल्ला इतर आजाराच्या रूग्णांना दिला जात आहे. खोकला, सर्दी, ताप या उन्हाळ्यातील नियमित आजारातही डॉक्टरांकडे जाण्याचे अनेकांनी टाळले. सरकारी रूग्णालयात गेल्यास आपल्याला क्वॉरनटाईन करतील. या भितीपोटी जिल्हा रूग्णालयातही अशा जेष्ठ नागरीकांनी जाण्याचे टाळले त्यामुळे खाजगी दवाखान्यासह जिल्हा रूग्णालय तसेच सावंगी व सेवाग्राम रूग्णालयातही इतर आजार रूग्णांची संख्या रोडावलेलीच आहे. काही रूग्णांचे नेहमीच डॉक्टरसुध्दा त्यांना या काळात भेटण्यास बोलाविण्याचे टाळत असल्यांचे दिसते.वर्ध्यांत बहुतांश खासगी दवाखाने बंदचशहरात काही डॉक्टर्स आपले दवाखाने नियमितपणे उघडून रूग्णांवर उपचार करतांना दिसत आहे. मात्र काही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंदच ठेवले आहे. मोबाईल फोनवरच ते रूग्णांना मार्गदर्शन करीत असल्याचे दिसून येत आहे. तर बऱ्याच रूग्णांनी औषध विक्रेत्यांच्या सल्यांनी आपल्या व्याधीवरील नियमीत औषधोपचार घेतला आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या घटलीलॉकडाऊनच्या या स्थितीत ग्रामीण भागात शहराकडे येणाऱ्या रूग्णांचा ओढाही मंदावला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बंद असल्याने यातून अर्ध्या तिकीटवर प्रवास करून अनेक जण रूग्णांलयात येत होते ते सुध्दा लॉकडाऊन झालेत. कोरोनाच्या या साथीत इतर आजार रूग्ण या तीन महिण्यात कमी झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या