शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना : नागरिकांनी ई-मेलद्वारे तक्रारी नोंदवाव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना हा विषाणूजन्य आजाराचा प्रसार गर्दीच्या ठिकाणी झपाट्याने होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात कलम १४४ लागू झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला विनाकारण जिल्हाकचेरीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कुठलीही समस्या असल्यास नागरिकांनी थेट ई-मेलवर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.कोरोना या विषाणू जन्य आजाराचा वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत प्रसार होऊ नये. शिवाय नेहमी गर्दी होणाºया ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात कुठल्याही नागरिकांला विनाकारण प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे.सुरक्षा रक्षक अन् कर्मचारी करताय नागरिकांचा गैरसमज दूरविविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमी नागरिक गर्दी करतात. याच इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय आहे. त्यामुळे कार्यालयीन दिवशी येथे नागरिकांची मोठी गर्दी राहते. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारावर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकासह कर्मचाºयांनी कार्यालयात काय म्हणून प्रवेश बंदी आहे. तुमचे कुठलेही काम असल्यास भिंतीवर चिटकविलेल्या सूचना फलकावरील अधिकाऱ्यांची थेट मोबाईलवर संपर्क साधा. शिवाय कुठलीही तक्रार असल्यास ई-मेलवर नोंदवा याची माहिती दिली. तर अनेक नागरिकांच्या तक्रारी आज स्विकारण्यात आल्या. असे असले तरी नागरिकांनी जमेतोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे. शिवाय नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. दक्षता म्हणून नागरिकांनी जिल्हाधिकरी, उपविभागीय महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयात येण्याचे टाळावे. कुठलीही तक्रार असल्यास वर्धाआरडीस, एसडीओवर्धा आणि आरओवर्धा या जीमेलच्या ुमेल आयडीवर तक्रार नोंदवावी.- प्रीती डुडुलकर, तहसीलदार, वर्धा.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस