शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

नवा मेन्यू फक्त नावालाच ! शालेय पोषण आहारात निधीमुळे झाला खोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:32 IST

Vardha : विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी शासनाची आहार योजना

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची तीन संरचित आहारपद्धती सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार शाळांना प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन आहे. परंतु याकरिता आवश्यक असलेल्या निधीची कमतरता असल्याने शिक्षकांना तीन संरचित पोषण आहार देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवा मेन्यू सध्यातरी नावालाच ठरत असल्याचे चित्र आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाकडून मेन्यूचे प्रकार ठरवून देण्यात आले आहे. प्रत्येक दिवसाचे मेन्यू कार्ड शिक्षक त मुख्याध्यापकांना दिले आहे. यातून विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत असला तरीही निधीअभावी शिक्षकांनाच पदरमोड करावी लागत आहे. यासोबतच त्याचा हिशेब ठेवतानाही नाकीनव येत आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्याने आता आहारात वैविधता आणण्यासाठी विविध पाककृतींचा समावेश केला आहे. या पोषण आहारानुसार विद्यार्थ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील मंगळवारी वाटणा मसालाभात आणि दुसऱ्या आठवड्यातील मंगळवारी सोयाबीन वडी द्यायची आहे. परंतु शाळांना कंत्राटदाराकडून त्या वस्तूंचा वेळेत पुरवठाच होत नाही. याशिवाय खीर बनविण्यासाठी साखर किंवा गूळ, दूधपावडर, नाचणीसत्त्व या पदार्थांचाही पुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे.

८१३९५ पोषण आहाराचे जिल्ह्यात लाभार्थी विद्यार्थीयामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे ४९ हजार १३९ तर सहावी ते आठवीपर्यंतचे ३२ हजार ३५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहेत.

असा आहे शालेय पोषण आहरामधील नवीन मेन्यू, विद्यार्थ्यांना त्याची प्रतीक्षाच

  • पोषण आहारामध्ये भाज्यांचा १ पुलाव, मसालेभात, मटर पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, वरण- भात, तांदळाची खीर, नाचणी सत्त्व, मोड आलेले कडधान्य आदी पदार्थांचा समावेश आहे.
  • यानुसार विद्यार्थ्यांना सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या चार दिवशी तांदळाची खीर, शनिवारी नाचणी सत्त्वाची खीर, बुधवारी अंडी द्यावी लागणार आहेत. परंतु याकरिता शासनाकडून शाळांना पैसेच मिळत नसल्याने हा पोषण आहार देतांना शिक्षकांना अडचणी निर्माण होत आहे.
  • मात्र ज्या शाळांचा पट मोठा आहे त्या शाळांतील मुख्याध्यापकांना एवढे साहित्य आणण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. त्याचे पैसे नंतर मिळणार असल्याचे शासनाने पत्रात म्हटले आहे. पण, आधीचेच पैसे मिळाले नसल्याचा अनुभव शिक्षकांना असल्याचे सांगितले जात आहे.

"जुलैपासून सप्टेंबर महिन्यापर्यंतचे इंधन व भाजीपाल्याचे २५ टक्के अनुदान अजूनही मिळाले नाही. ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंतचे इंधन भाजीपाल्याचे संपूर्ण अनुदान अप्राप्त आहे. सप्टेंबर महिन्यापासून स्वयंपाकी आणि मदतनिसांचे अनुदान मिळालेले नाही. खीर, अंडी पुलाव किंवा नाचणी सत्त्व अशा पूरक आहारासाठी कोणतेच अनुदान मिळाले नाही. तीन वर्षांपासून मुख्याध्यापकांचे मानधनसुद्धा नाही. मागील दहा दिवसापासून मुख्याध्यापक तीन वर्षाचा संपूर्ण पोषण आहार योजनेचा ऑफलाइन आणि ऑनलाइन हिशोब देण्यात व्यस्त आहेत. शालेय पोषण आहार योजना मुख्याध्यापक- शिक्षकांसाठी डोकेदुखी बनली आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी योजना अत्यावश्यक आहे. परंतु सदर योजना स्वतंत्र यंत्रणेकडेच सोपविली पाहिजे."- विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

 

टॅग्स :Schoolशाळाfoodअन्नwardha-acवर्धा