शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

निष्काळजीपणा; शिक्षण हक्कावर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:12 PM

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्याच सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ विद्यार्थी आता प्रवेशाकरिता अपात्र ठरले आहे.

ठळक मुद्दे‘आरटीई’पासून २७३ विद्यार्थी वंचित : संपर्क न करणारे विद्यार्थी ठरले अपात्र

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्याच सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ विद्यार्थी आता प्रवेशाकरिता अपात्र ठरले आहे. अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना आरटीईतील प्रवेशापासून वंचित रहावे लागणार असून पालकांच्या निष्काळजीमुळेच या विद्यार्थ्याच्या ‘शिक्षण हक्का’ वर गदा आल्याचे दिसून येत आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १३३ शाळांमध्ये १ हजार ४०३ जागांसाठी सुरु असलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ३ हजार ९९५ आॅनलाईन अर्ज आले. त्यासाठी झालेल्या पहिल्या सोडतीत १ हजार १०७ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. पहिल्या फेरीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना वेळोवेळी मोबाईलवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आली. प्रवेशाकरिता दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही १० मे या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील पालकांनी शाळा, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संपर्क साधला नाही. परिणामी २७३ विद्यार्थी आरटीईच्या प्रवेशासाठी अपात्र ठरले आहे. विशेषत: पहिल्या फेरीत अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या फेरीत प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.कागदपत्रांअभावी १७ अर्ज ‘रिजेक्ट’आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत १७ अर्ज कागदपत्राच्या त्रुटीत अडकल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने अपात्र ठरविले आहे. यामध्ये देवळी व सेलू तालुक्यात प्रत्येकी एक, हिंगणघाट तालुक्यात दहा तर वर्धा तालुक्यात ५ असे एकूण १७ विद्यार्थी अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व जन्माचा दाखला आदी प्रमाणपत्रातच त्रुट्या आढळून आल्या. या १७ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ४ ते ५ विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र हे महाराष्ट्राबाहेरील राज्यातील असल्याने त्यांना प्रवेशापासून मुकावे लागले. या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून आॅनलाईन अर्ज केला असता तर त्यांच्या प्रवेश मिळाला असता, असे शिक्षण विभागाने सांगितले.अपात्रतेत वर्धा तालुका अव्वलआरटीईअंतर्गत आठही तालुक्यात काही प्रमाणात विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत. ज्यामध्ये कागदपत्रामधील त्रुटी किंवा संपर्क न करणे अशा कारणांचा समावेश आहे. सर्वाधिक १०० विद्यार्थी वर्धा तालुक्यात अपात्र ठरले आहे.आर्वी तालुक्यात २०, आष्टी १७, देवळी ५५, हिंगणघाट ५०, कारंजा १३, समुद्रपूर ११ तर सेलू तालुक्यात ७ असे एकूण २७३ विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रि येत अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार नाही.पहिली फेरी संपली असून त्यातील प्रवेश प्रक्रियाही आटोपली. आता दुसरी फेरी २० मे नंतर होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी