शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज - बच्चू कडू

By admin | Updated: April 15, 2016 02:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या हिताला प्राधान्य दिले. जात, धर्माच्या पहिले त्यांनी देश पाहिला.

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या हिताला प्राधान्य दिले. जात, धर्माच्या पहिले त्यांनी देश पाहिला. त्यांच्या विचाराला कृतीत उतरविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने शहरातील पोलीस ग्राऊंड येथे बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
मंचावर तहसीलदार राहुल सारंग, संयोजक प्रमोद राऊत, आयबीएन लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विनोद राऊत, सामाजिक कार्यकर्ते सफदर अली, समितीचे अध्यक्ष विशाल रामटेके व अतुल दिवे विराजमान होते.
घटनेद्वारे समता, बंधूता निर्माण करण्याचे स्वप्न बाबासाहेबांचे होते. आपला देश प्रजासत्ताक देश आहे. म्हणजे प्रजेची सत्ता. मात्र आज नोकरशाही, नेते राजे झालेत आणि प्रजा त्याची गुलाम झाली आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समता खऱ्या अर्थाने आणण्यासाठी आपल्याला काम केले पाहिजे, असे आवाहनही आ. कडू यांनी केले. जन्माने नाही तर कर्तृत्वाने भीमसैनिक आहे, असेही ते म्हणाले. नोकरशाहीला ‘थप्पड’ का मारली हे सांगताना ते म्हणाले, जर शेतकऱ्यांचे काम होत नसेल, गरीबांचे काम होत नसेल, तर आम्ही काय करावे, असा सवालही यावेळी आ. कडू यांनी उपस्थित केला. तहसीलदार राहुल सारंग यांनी बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, स्वप्न प्रत्येकांत उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जनतेला केले.