शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

शेतकऱ्यांच्या विकासासाठी निरोगी पशुधन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:47 AM

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देसुधीर दिवे : आर्वी विधानसभा क्षेत्रात पशु तपासणी शिबीर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. ३० नोव्हेंबरपासून आर्वी परिसरात मोफत पशुचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक केंद्रीय जलसंधारण मंत्री यांचे विशेष सल्लागार सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाने पदव्युत्तर विभागाचे सुमारे २० डॉक्टर, पदवी प्रशिक्षण येणाºया अंतिम वर्षाचे सुमारे ५० डॉक्टर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सर्व डॉक्टर असे सुमारे १०० डॉक्टर तपासणी करतील.यासंदर्भात माहिती देतांना सुधीर दिवे पुढे म्हणाले की, सात दिवस विविध ठिकाणी ही शिबिरे होणार आहेत. मोफत तपासणी, शस्त्रक्रिया, लसीकरण व उपचारासोबतच तज्ज्ञ पशुचिकित्सक शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत. जाजूवाडी आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन पशुवैद्यक व मत्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांच्या हस्ते होईल. तसेच ३० नोव्हेंबरला आर्वी येथे गायी, म्हशी व इतर पशुधनासोबतच पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा यावरही शस्त्रक्रीयेसह इतरही उपचार करण्यात येतील. १ डिसेंबरला साहूर, २ डिसेंबर विरुळ, ३ ला खरांगणा, ४ ला कन्नमवारग्राम, ५ ला नारा, ६ डिसेंबर रोजी रोहणा या ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये सकाळी ७.३० वाजता शिबिरांना प्रारंभ होईल. समारोप ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आशिर्वाद मंगल कार्यालय आर्वी येथे होणार आहे. समारोप कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभाग पुणेचे आयुक्त डॉ. उमाकांत उमप उपस्थित राहणार आहे.आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर दिवे यांनी पत्रपरिषदेत केले. पशुपालकांनी नाव नोंदणीसाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्वी, आष्टी, कारंजा आणि तळेगाव येथील कार्यालयात संपर्क साधावा. पत्रपरिषदेला नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बन्नाळीकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, डॉ. सुनील सहातपुरे, डॉ. वसुनाथे उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी