शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

तरोडाच्या ओसाड जमीनीला नेसविला हिरवा शालू, वर्षभ-यातच रोपट्यांनी गाठली सहा फुटाची उंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 18:29 IST

वृक्षारोपण व वृक्षसंवधनाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष लागवड उपक्रम गत वर्षापासून शासनाने हाती घेतला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेसाठी स्थानिक वन विभागानेही कंबर कसली आहे.

वर्धा, दि. 11 - वृक्षारोपण व वृक्षसंवधनाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष लागवड उपक्रम गत वर्षापासून शासनाने हाती घेतला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेसाठी स्थानिक वन विभागानेही कंबर कसली आहे. गत वर्षी तरोडा येथील ओसाड जमीनीची निवड करून तेथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्यात आली होती. सदर वृक्षांची वेळोवेळी योग्य निगा घेण्यात आल्याने सध्या या रोपट्यांनी सहा फुटाच्यावर उंची गाठली असून एकूणच या उपक्रमामुळे तरोडाच्या ओसाड जमीनीला हिरवा शालू नेसविण्यात वर्धा वन विभागाला यश आल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

गत वर्षी वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने शासनाने दिलेल्या वृक्षारोपणाच्या उद्दिष्टपूर्तीकरिता खासदार दत्तक ग्राम असलेल्या मौजा तरोडा येथील सर्वे क्रमांक ११/२, ५६ या २४ हेक्टर ओसाड जमीनीची निवड केली. सदर ओसाड जमीनीवर गत वर्षी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेत श्रमदान करून तेथे मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींची एकूण २७ हजार ५०० रोपटी लावली. केवळ रोपटे लावून संबंधीत कर्मचारी व अधिकारी थांबले नाहीत तर त्यांनी लावलेल्या रोपट्यांची वेळोवेळी निगाही घेतली. परिणामी, सदर एक वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्यांनी सध्या सहा फुटाच्यावर उंची गाठली आहे.   पूर्वी हा भाग वृक्षाविना ओसाड होता. परंतु, वनविभागाच्या या उपक्रमामुळे सध्या हा परिसर हरितमय झाला आहे. यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच परिसरात अधीक ५ हजार रोपटी लावण्यात आल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

अधिका-यांनी केली पाहणी...

मौजा तरोडा येथील ओसाड जमीनीला वनविभागाने हरितमय केले आहे. तेथील रोपट्यांची सध्याची स्थित, त्यांना वेळीच खत व पाणी दिल्या जाते काय याची पाहणी नुकतीच वन विभागाच्या अधिकाºयांनी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहाय्यक एस. आर. परटक्के, बीट रक्षक विलास पोहेकर आदींची उपस्थिती होती.

२७ हजार ५०० वृक्ष उत्तम स्थितीत...

मौजा तरोडा येथे गत वर्षी लावण्यात आलेली काही रोपटे विविध कारणांमुळे करपली तर काही रोपटी पुर्णत: वाळून गेल्याने त्यांच्या जागेवर यंदाच्या वर्षी नव्याने ५ हजार रोपटी लावण्यात आली आहे. सध्या हिरव्यागार झालेल्या तरोडा येथील या जमीनीवर साग, आवळा, बांबु, खैर, चिंच, पापडा, बेघड, कडुनिंब आदी प्रजातींची २७ हजार ५०० रोपटी उत्तम स्थितीत असल्याचे सांगण्यात आले.