शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

बहुऔषधीयुक्त ‘जांभुळ’ झाड होतेय दुर्मिळ

By admin | Updated: May 30, 2016 01:56 IST

बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे.

१०० वर्षांपेक्षा अधिक जगणारे झाड : आयुर्वेदात वृक्षाला मोठे महत्त्वपिंपळखुटा : बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे. वाढती वृक्षतोड याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, जांभुळ फळाचे दर्शनही दुर्मिळ होत आहे. जून महिना लागताच १०० रुपये किलो प्रमाणे ही फळे खरेदी करावी लागतात. जांभळाची फळे नव्हे तर पाने, फुले, साल, खोड आणि बियांचाही औषधी म्हणून उपयोग होतो. आयुर्वेदात या वृक्षाला मोठे महत्त्व आहे.मे व जून महिन्याच्या कालावधीत ‘डोंगराची काळी मैना’ म्हणून जांभुळाचे आगमन होते. जांभळात लोहाचे प्रमाण अधिक असते. मधुमेहाच्या आजारात हे फळ महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने त्या रुग्णांसाठी ही फळे वरदानच ठरली आहेत. मधुमेहासोबतच रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, अस्थमा या आजारांतही जांभळाचे सेवन उपयुक्त ठरते. दररोज ४ ते ५ जांभळाचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य होते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासह हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात जांभळे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जांभळाची महती औषधी गुणधर्मावरच थांबत नाही तर जांभूळ हे उत्तम सौंदर्यप्रसाधक म्हणूनही काम करते. या फळापासून वाईन, व्हीनेगर, जेली, शरबत आदी तयार करण्यास अलिकडे सुरूवात झाली आहे. यातून नवीन उद्योगाची उभारणी होऊ लागली आहे. अशा उद्योगांकडून थेट जांभुळ खरेदी होत असल्याने त्याचा परिणाम खुल्या बाजारपेठेवर होऊ लागला आहे. यामुळे पूर्वी दिसणारी जांभळं आता बाजारात ठरावीक ठिकाणी दिसतात. या वृक्षाचे लाकूड टिकाऊ व पाणीरोधक असल्याने ते किमान १०० वर्षे टिकते. आता इमारती सिमेंटच्या असल्या तरी पूर्वी जांभुळ वृक्षाच्या राहत होत्या. बहुऔषधी, बहुपयोगी गुणधर्म जांळूळ झाडांसाठी अलिकडे कर्दनकाळ ठरला आहे. मानवाने निसर्गाकडून काही घेण्याच्या मोबदल्यात वृक्ष लागवड केली नाही. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.(वार्ताहर)औषधी गुणधर्मच ठरला कर्दनकाळजांभूळ या वृक्षाचा औषधी व बहुपयोगी गुणधर्मच त्या वृक्षासाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसते. लाकूड व औषधासाठी वृक्षांची कटाई होते; पण जांभूळ वृक्षांची लागवड होताना दिसत नाही. यामुळे ग्रामीण भागातूनही हे वृक्ष दिसेनासे होत असल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.