शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

टंचाईच्या काळात मिनरल वॉटरचा धंदा फोफावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:23 AM

जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आले आहे.

ठळक मुद्देशुद्धतेवरही प्रश्नचिन्ह : पाण्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आले आहे. पहाटेपासूनच पाण्याचे कॅन भरलेले आॅटो शहरात व ग्रामीण भागात फिरताना दिसून येत आहे. एकट्या वर्धा शहर व परिसरातील ११ गावांमध्ये पाचशेवर अधिक मिनरल वॉटर विकणारे दुकानदारी थाटून आहेत. यातील अनेकांकडे अन्न औषध प्रशासनाकडून परवानाही नाही. नागरिकांना विहिरी व बोरवेलचे पाणी काढून थंड करून ते विकण्याचा गोरस धंदा जोरात सुरू आहे. पुर्वी साधारणत: १५ ते २० रूपयाला विकली जाणारी पाण्याची कॅन आज ३० ते ४० रूपयावर गेली आहे. घ्यायची असेल तर घ्या, असा दम ग्राहकांना दिला जात आहे. घरपोच पाणी पुरवठ्याचा हा धंदा ग्रामीण भागातही जोरात आहे.कुणाचेही नियंत्रण नाहीमिनरल वॉटर विकणाऱ्या कंपनीत मनुष्यबळाचा वापरच केला जात नाही. आॅटोमेशन मशीनद्वारे आपोआप पाणी शुध्द करून ते कॅनमध्ये भरले जाते. यात मनुष्याचे हात, डोके आदीचे केस पडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. तसेच अन्न, औषध प्रशासनाकडून पाण्याचे नमूने वारंवार तपासून घ्यावे लागतात. त्यांची परवानगी हा व्यवसाय उघडण्यासाठी घ्यावी लागते. मात्र वर्धा शहरात या सर्व निकषाचे पालन करणारे मोजकेच पाणी विक्री करणारे आहे. बाकी इतरत्र सर्वत्र मिळेल ते पाणी ग्राहकांना थंड करून विकण्याचा धंदा सुरू आहे. यावर जिल्हा प्रशासनासह अन्न औषध प्रशासनाचेही नियंत्रण राहिलेले नाही.पाणी विक्रेत्यांनी परिसर घेतले वाटूनया मिनरल वॉटर विकणाऱ्या विक्रेत्यांनी आपआपले परिसर वाटून घेतले आहे. त्यामुळे इतरांच्या भागात दुसरे विक्रेते जात नाही. ग्राहकांना नाईलाजास्तव महागाचे पाणी खरेदी करावेच लागते. या कामासाठी ठेवण्यात आलेले तरूण नवे ग्राहक शोधण्याचे काम करीत असतात. काहींची तर पाणी फॅक्टरी त्यांच्या इतर व्यवसायाच्याच दुकानात थाटण्यात आली आहे. तेथूनच पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामपंचायत प्रशासनाकडेही अशा व्यवसायिकांच्या नोंदी नाही.

टॅग्स :Mineral Waterमिनरल वॉटरwater shortageपाणीटंचाई