शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

महिलांच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा मंत्रालयावर धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 3:41 PM

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा येथे आज आले होते.

हिंगणघाट - हिंगणघाट येथे घडलेल्या प्राध्यापक तरुणीवर झालेल्या अत्याचारासोबतच राज्यातील महिला व मुलींच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारे 27 फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील (परळी) हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा येथे आज आले होते. सदर कुटुंबियांना मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने दिलासा देण्यात आला. त्या नंतर हिंगणघाट येथे झालेल्या वार्ताहर परिषदेत या संदर्भातील मागण्या 26 फेब्रुवारी पर्यंत मान्य न झाल्यास 27 फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असे आबासाहेब पाटील यांनी जाहीर केले.

पिडीत कुटुंबाला 25 लाख रुपयांची त्वरीत मदत करण्यात यावी,पिडीतेच्या भावाला शासनाने तात्काळ शासकिय नोकरी द्यावी,या प्रकरणाचे आरोप पत्र तात्काळ न्यायालयात दाखल करण्यात यावे, प्रकरणाची तात्काळ जलद गती न्यायालयातुन सुनावणी करण्यात यावी,सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावे इत्यादी मागण्यांसोबतच महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने यापुढे महाराष्ट्र शासनाने अशा घटनेतील आरोपीला एक महिन्यात फाशीची शिक्षा करण्याचा कायदा करावा अशा मागण्या मराठा ठोक मोर्चाद्वारे पुढे करण्यात आल्या आहेत. या वार्ताहर परिषदेला संघटनेचे राज्य कार्यकारीणी पदाधिकार्‍यां सोबतच हिंगणघाटचे शरदराव शिर्के, प्रविन काळे व अक्षय भांडवलकर यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbaiमुंबईPoliceपोलिस