शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Maharashtra Election 2019 ; देशातील सर्वांत मोठी शेतकरी कर्जमाफी राज्यात झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील सर्व आश्वासने दिली आहेत.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस: कारंजा येथे जाहीर सभेत विरोधकांवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : राज्यातील शेतकऱ्यांना देशातील आजपर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी भाजप-सेना सरकारने दिली. त्या कर्जमाफीचे काम अजूनही सुरू आहे. दुष्काळ, अनुदान बोंडअळी अनुदान, ट्रॅक्टरचे अनुदान अशा शेतकरी हिताच्या अनेक योजना भाजप शिवसेना सरकारने ५ वर्षांत राबविल्या. ५ वर्षांत ५० हजार कोटींची विकासकामे केलीत. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी कारंजा (घा) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभा मंचावर माजी आ. दादाराव केचे, आ. डॉ. रामदास आंबटकर, जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर सर्व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व कारंजा येथील भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील सर्व आश्वासने दिली आहेत. या भागाचे विद्यमान आमदार हे निष्क्रिय असून एकदाही ते माझ्याकडे जनसामान्यांच्या कामाकरिता आले नाहीत. आपण आर्वी विधानसभा क्षेत्राकरिता १,३०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केलीत. काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांच्या १५ वर्षांच्या कामांचा हिशेब द्यावा. जनतेने १५ वर्षे त्यांची व भाजपची ५ वर्षे यातील कामांची तुलना करावी, असे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार, नदीचे पुनरुज्जीवन, ५ लाख लोकांना कृषिपंप, ड्रायपोर्टची निर्र्मिती अशी अनेक विकासात्मक कामे सरकारने केलीत. येत्या पाच वर्षांत कारंजा तालुक्याच्या कार नदी उपसा सिंचन प्रकल्पाला पहिल्यांदा पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी आर्वी विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते संदीप दिलीप काळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सभेचे संचालन दिलीप जसुतकर यांनी केले.

टॅग्स :wardha-acवर्धाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस