शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Maharashtra Election 2019 ; देशातील सर्वांत मोठी शेतकरी कर्जमाफी राज्यात झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील सर्व आश्वासने दिली आहेत.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस: कारंजा येथे जाहीर सभेत विरोधकांवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : राज्यातील शेतकऱ्यांना देशातील आजपर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी भाजप-सेना सरकारने दिली. त्या कर्जमाफीचे काम अजूनही सुरू आहे. दुष्काळ, अनुदान बोंडअळी अनुदान, ट्रॅक्टरचे अनुदान अशा शेतकरी हिताच्या अनेक योजना भाजप शिवसेना सरकारने ५ वर्षांत राबविल्या. ५ वर्षांत ५० हजार कोटींची विकासकामे केलीत. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी कारंजा (घा) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभा मंचावर माजी आ. दादाराव केचे, आ. डॉ. रामदास आंबटकर, जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर सर्व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व कारंजा येथील भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील सर्व आश्वासने दिली आहेत. या भागाचे विद्यमान आमदार हे निष्क्रिय असून एकदाही ते माझ्याकडे जनसामान्यांच्या कामाकरिता आले नाहीत. आपण आर्वी विधानसभा क्षेत्राकरिता १,३०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केलीत. काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांच्या १५ वर्षांच्या कामांचा हिशेब द्यावा. जनतेने १५ वर्षे त्यांची व भाजपची ५ वर्षे यातील कामांची तुलना करावी, असे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार, नदीचे पुनरुज्जीवन, ५ लाख लोकांना कृषिपंप, ड्रायपोर्टची निर्र्मिती अशी अनेक विकासात्मक कामे सरकारने केलीत. येत्या पाच वर्षांत कारंजा तालुक्याच्या कार नदी उपसा सिंचन प्रकल्पाला पहिल्यांदा पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी आर्वी विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते संदीप दिलीप काळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सभेचे संचालन दिलीप जसुतकर यांनी केले.

टॅग्स :wardha-acवर्धाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस