शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; देशातील सर्वांत मोठी शेतकरी कर्जमाफी राज्यात झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील सर्व आश्वासने दिली आहेत.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस: कारंजा येथे जाहीर सभेत विरोधकांवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : राज्यातील शेतकऱ्यांना देशातील आजपर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी भाजप-सेना सरकारने दिली. त्या कर्जमाफीचे काम अजूनही सुरू आहे. दुष्काळ, अनुदान बोंडअळी अनुदान, ट्रॅक्टरचे अनुदान अशा शेतकरी हिताच्या अनेक योजना भाजप शिवसेना सरकारने ५ वर्षांत राबविल्या. ५ वर्षांत ५० हजार कोटींची विकासकामे केलीत. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी कारंजा (घा) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभा मंचावर माजी आ. दादाराव केचे, आ. डॉ. रामदास आंबटकर, जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर सर्व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व कारंजा येथील भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील सर्व आश्वासने दिली आहेत. या भागाचे विद्यमान आमदार हे निष्क्रिय असून एकदाही ते माझ्याकडे जनसामान्यांच्या कामाकरिता आले नाहीत. आपण आर्वी विधानसभा क्षेत्राकरिता १,३०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केलीत. काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांच्या १५ वर्षांच्या कामांचा हिशेब द्यावा. जनतेने १५ वर्षे त्यांची व भाजपची ५ वर्षे यातील कामांची तुलना करावी, असे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार, नदीचे पुनरुज्जीवन, ५ लाख लोकांना कृषिपंप, ड्रायपोर्टची निर्र्मिती अशी अनेक विकासात्मक कामे सरकारने केलीत. येत्या पाच वर्षांत कारंजा तालुक्याच्या कार नदी उपसा सिंचन प्रकल्पाला पहिल्यांदा पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी आर्वी विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते संदीप दिलीप काळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सभेचे संचालन दिलीप जसुतकर यांनी केले.

टॅग्स :wardha-acवर्धाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस