शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत; ग्रामसभांमध्ये ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 14:14 IST

ठरावाची प्रत पाठविणार शासन दरबारी; शिक्षक संघटनांचा आक्रमक पवित्रा

वर्धा : ८६ वी घटना दुरुस्ती करून बालकांच्या मोफत व सक्तीच्या जीविताच्या हक्काच्या २१ या कलमाला २१-अ जोडून आरटीई कायदा करण्यात आला. मात्र, आता २० पेक्षा कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे.

कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद झाल्यास गोरगरीब, शोषित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची परवड होईल, शाळा बंद न करण्यासाठी आता विविध शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, ग्रामपंचायतीत ठराव घेऊन ठरावाची प्रत शासनदरबारी पाठविण्यात येणार आहे. 

शिक्षणावर खूप खर्च होत असल्याने सरकारला शाळा चालविणे परवडत नाही, असे म्हणून किंवा आडवळणाने कोणतेही कारण सांगत शाळा बंद करणे वा सरकारी शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे सरकारने मूलभूत अधिकाराचे हनन करणे आहे.

शाळा बंद झाल्यास शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे आलेले घटक पुन्हा अंधकाराच्या गर्तेत ढकलले जातील. अशा विपरीत परिस्थितीत शिक्षण म्हणून राज्यातील कोणतीही शाळा बंद होऊ नये, यासाठी वैयक्तिक पातळीवर कर्तव्य म्हणून प्रामाणिक प्रयत्न करण्याची आज गरज आहे. 

राज्यातील कोणतीही शाळा बंद करू नये यासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव होण्यासाठी लोकप्रतिनिधी, समाजातील जबाबदार व संवेदनशील घटक म्हणून पुढाकार घ्यावा, गावात शाळेचे महत्त्व समजावून सांगावे, ग्रामपंचायतीत ठराव घेऊन ठरावाची प्रत प्रशासनिक यंत्रणेकडे पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे.

वाशिम जिल्ह्यात घेतला ठराव

कमी पटसंख्येच्या नावाखाली कोणतीच शाळा बंद करू नये, याबाबतचा ठराव वाशिम जिल्ह्यातील खरोळ ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील विविध गावांतील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन सरकार दरबारी ठरावाची प्रत पाठविण्याची नितांत गरज आहे.

राज्यातील कोणतीही शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद होऊ नये, यासाठी इतर गावांतील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ग्रामसभेने ठराव घेतल्यास चळवळ अधिक बळकट होईल. सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला विचार करावा लागेल. शिक्षक बांधवांनी यासाठी सर्वत्र प्रयत्न करावेत.

- विजय कोंबे, राज्य सरचिटणीस, राज्य प्रा. शिक्षक समिती

टॅग्स :Educationशिक्षणzpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक